Amazon

Tuesday, December 29, 2015

तुला आठवतंय?

तुला आठवतंय? ते कलकलतं ऊन होतं.
ज्वारीच्या ताटव्यात तृषार्त वेदना होत्या.
वडाच्या पारंब्यांना जमिनीची ओढ
आणि तापल्या धुळीला वाऱ्याची.
अशा दुपारी तुझे पैंजण ऐकले
बांधावरच्या सावलीचा पुंजका टाकलेल्या बाभळीनं.
तुला आठवतंय?
माझ्या सायकलच्या प्यांडलची लय
अजून तुझ्या छातीत धडधडत असेल,
मला अजूनही खात्री आहे.
सर्वत्र लाहीलाही करणारी तप्तं भूमी,
आणि तुझ्या माथ्यावर पाण्याचा हंडा.
ती दुपार, ते ऊन, ती धूळ
आणि श्वास? तेही ऊष्ण.
तू गेलीस त्या वाटेवर आजही पावा घुमतो,
तू गेलीस त्या वाटेवर आजही ते ऊन तसच पसरलेलय.
तू गेलीस त्या वाटेवर आजही ते ऊन तसच पसरलेलय.
तू गेलीस तो बांध, ती बाभळ, तो मी. आम्ही सारे सारे तसेच आहोत.
तू गेलीस, चैतन्य गेलं. आता उरावे रिकामे भांडे, फक्त उपयोगापूरते.
यंदाच्या हंगामात राणाला जेंव्हा नवे कोंब फुट्तील, बाभळीला पिवळी फूलं येतील,
तेंव्हा परत येशील? येशील ना?
——– सुंबरानं चित्रपटातील कविता ——-

२७. चाहूल ( इयत्ता दुसरी, १९९० )


Friday, November 6, 2015

सागराने

सागराने नाविका मनी संकट मोठे पेरले,
वादळाने होडीस एका दशदिशांनी घेरले
शीड तुटले, खीळ तुटले, कथा काय या वल्ह्याची,
नाविकास ही फिकीर नव्हती, पुढे राहिल्या पल्ल्याची...

नशीब नव्हते पाठीशी, नव्हता अनुभव गाठीशी
उभा ठाकला एकटाच, युद्ध होते वादळाच्या वय वर्षे साठीशी
स्वबळी विश्वास मोठा, त्यास तोड कर्तुत्वही
रौद्र वादळ शांत झाहले, पागळले शत्रुत्वही.

एकवटला धीर हा, कोठूनी येतो त्या क्षणी,
शत बाहूंचे बळ येते, जव मातृत्व तरळते मनी.


              - किल्ला (मराठी चित्रपट)

Tuesday, October 20, 2015

गद्यात सांगता येणार नाही म्हणून पद्यात सांगितलेलं बरच काही

तू पावसाळी माती,
धुंद कुंद,
सर्दावलेल्या मोसमात,
सुंगंधणारी.
तू सर हिरवी,
शार, बेधुंद
स्वप्नात माझ्या  येऊन
भिजवणारी.
-- #3D सुज्या

धडाम धुडूम पडतो हा,
असा कसा वागतो हा
शाळा सुटून चिंचेखाली
बरोबर मला गाठतो हा.

दप्तर ओले, ओल्या वेण्या,
वेडा पिसा वागतो हा
निळी छत्री झाली ओली
तांबड्या रस्त्यावरती.

बुळूक बुळूक गम बूट
वागणे याचे बेछूट
भिजवून मला हसतो  आणि
डोळ्यात माझ्या साठतो हा.
--#3D मीनू

ये बघ ना तू, ढग कसे भरून आलेत
चहा वर वाफ सुद्धा रेंगाळतेय क्षणभर .

आळस ठसठसतोय आज, आणि आठवतंय,
तुझ लोळत माझ्या केसांची खेळणं.

आठवतंय खिडकीच्या तावदानावर,
वाजणारी टप टप ऐकत लोळणं.

आता तूच हो पावसाची सर आणि
बरस माझ्या अंगणात,

आणि अशीच ये तुझ्या आठवणीसारखी न सांगता
मी कुठेही गेले तरी.
--#3D रेश्मा.


भजी , बुरजी आणि भावविश्व

माझ्या काही मित्रांना खुप कविता होत  होत्या त्या काळची गोष्ट
त्यांच्या प्रेमभंगात रंग फुलले होते त्यात पावसाची भर आणि
भर रस्त्यात बुरजी पावची गाडी, मित्र म्हणायचे -
तिच्या डोळ्यात दाटतो पाऊस,
समोर भजी गरमा गरमआणि इथे खिसे रिकामे.

एखादा नुसताच कवितेच्या ओळीत येऊन झिंगलेला दिसायचा
इथे तिथे नुसती प्रेमाची पिल्लावळ आणि त्यात परत पाऊस

मी म्हणालो   बाबा रे पड आता
तुझ्या वैचारिक बांधिलकी विषयी नाही विचारणार कोणी  
जमाना तो राहिला नाही, आता फार फार तर
प्रेमकविता, बुरजी आणि भजी मिळतील नाक्यावर तुझ्या नावाची.

--#3D कैवल्ल्या


खूप झालं तुझं , ये पावसा
खूप झालं राव तुझं आता पड नाहीतर,
बघ माझी ठिगळ जोडलेली गोदडी
अंगणात वाळून कागद झाली
पण तुझ्या मऊ ढगांच्या हृदयाचा
एक धागाही नाही उसवला.

माय गेली पावसात तेंव्हा
रुसलो सुद्धा नाही तुझ्यावर
मग आता कारे तुझा असा माज
फुटू दे ना ढग सुटू दे ना
ओली ढिगळ, मग
दाटून येऊ दे पुन्हा

माझ्या मायच्या शिलाई मशीनची शपथ
घेऊन सांगतो तुला एक एक ढग
शिऊन तुझी मऊ रजई परत देईन तुला.


Source: #3D Episode 91

Tuesday, October 13, 2015

Beautiful Quotes From Rumi That Will Shift Your Perception About Life


“If you are irritated by every rub, how will your mirror be polished?” 

“You were born with wings, why prefer to crawl through life?” 

“The wound is the place where the Light enters you.” 

“Dance, when you’re broken open. Dance, if you’ve torn the bandage off. Dance in the middle of the fighting. Dance in your blood. Dance when you’re perfectly free.”

“Knock, And He’ll open the door
Vanish, And He’ll make you shine like the sun
fall, And He’ll raise you to the heavens
Become nothing, And He’ll turn you into everything.”
“When you do things from your soul, you feel a river moving in you, a joy.” 
 
“My soul is from elsewhere, I’m sure of that, and I intend to end up there.”

“Let yourself be drawn by the stronger pull of that which you truly love.” 

“Be empty of worrying.
Think of who created thought!
Why do you stay in prison
When the door is so wide open?” 

“This being human is a guest house. Every morning is a new arrival. A joy, a depression, a meanness, some momentary awareness comes as an unexpected visitor…
Welcome and entertain them all. Treat each guest honorably. The dark thought, the shame, the malice, meet them at the door laughing, and invite them in. Be grateful for whoever comes, because each has been sent as a guide from beyond.” 

“But listen to me. For one moment quit being sad. Hear blessings dropping their blossoms around you.” 

“Raise your words, not voice. It is rain that grows flowers, not thunder.” 
 
“Yesterday I was clever, so I wanted to change the world. Today I am wise, so I am changing myself.”

“Keep walking, though there’s no place to get to.
Don’t try to see through the distances.
That’s not for human beings. Move within,
But don’t move the way fear makes you move.” \

“The morning wind spreads its fresh smell. We must get up and take that in, that wind that lets us live. Breathe before it’s gone.” 

“Work on your strong qualities
and become resplendent like the ruby.
Practice self-denial and accept difficulty.
Always see infinite life in letting the self die.
Your stoniness will decrease; your ruby nature will grow.
The signs of self-existence will leave your body,
and ecstasy will take you over.” 

“Peaceful is the one who’s not concerned with having more or less.
Unbound by name and fame, he is free from sorrow from the world and mostly from himself.” 


“On a day when the wind is perfect, the sail just needs to open and the world is full of beauty.
Today is such a day.”


 

Friday, September 18, 2015

श्रम ही है श्रीराम हमारा - बाबा आमटे



बाबा आमटेंना आपण ओळखतो ते त्यांनी कुष्ठरुग्णासाठी उभारलेल्या आनंदवनासाठी;पण त्यांचं काम तेवढ्यापुरतं मर्यादित नव्हतं. बाबांचा ‘भारत जोडो यात्रा’ आणि ‘नर्मदा बचाव आंदोलन’ याच्यामधील सहभाग गांधींच्या रचनात्मक संघर्षाचं द्योतक होता. बाबांच्या एकूण विचारात ‘श्रम’ या संकल्पनेला विशेष महत्व दिलेलं आहे. त्यांच्या काही वाक्यांमधून, घोषणांमधून हेच प्रतीत होत, जसं की-
‘श्रम ही है श्रीराम हमारा’
‘ हाथ लगे निर्माण में, नही मांगने, नही मारने’
“कष्ट करुन घामेजलेलं शरीर हेच परमेश्वराचं रुप आहे. खरोखरची क्रांती कधीच विनाशकारी नसते.ख-या क्रांतीतून मोठं कार्य उभं रहातं. अशी क्रांती रक्तलांछित नसते तर कष्टाच्या घामाने थबथबलेली असते.”
आनंदवन थोडं स्थिरस्थावर झाल्यावर बाबांच लक्ष तरुणाईकडे गेलं. तरुणाई घडवणा-या शिक्षणव्यवस्थेतील त्रुटी त्यांनी जाणल्या आणि श्रमाचा तिरस्कार करणा-या तरुणाईवर श्रमाचा संस्कार व्हावा म्हणून श्रमिक विद्यापीठाची कल्पना त्यांना सुचली. त्यासाठी त्यांनी शासनाला जागेची मागणी केली. आनंदवनापासून जवळच मूल तालुक्यात १८०० एकर जमीन देण्यात आली;पण तिथं लोक वस्ती करुन रहात होते. बाबांनी त्या जमीनीचा त्याग केला नि महारोगी समितीला त्या ठिकाणी १२५० एकर जमीन मिळाली तिथे तिथल्या सोमनाथ ( महादेव) मंदिरामुळं या प्रकल्पाला सोमनाथ असं नाव पडलं. बाबांनी सोमनाथ हा ‘स्वयंपूर्ण शेतकी’ प्रकल्प म्हणून विकसित केला. सोमनाथ तर आता गांधींच्या स्वप्नातलं खेडं बनलं आहे. सोमनाथमधले बरे झालेले कुष्ठरोगी त्यांची स्वतःची संसाधने, रक्त, घाम माती, कष्ट वापरुन एकत्र राहतात. सोमनाथमध्ये कुष्ठरोग्यांनीच धान्याचे कोठार उभारलं आहे नि सोमनाथमध्ये मत्स्यव्यवसाय, दुग्धव्यवसाय..आदी शेतीपूरक व्यवसायांचंही केंद्र आहे.
बाबा श्रमिक विद्यापीठ उभा करु शकले नाहीत ;पण सोमनाथची स्थापना झाल्यापासून इस.१९६७ पासून श्रमसंस्कार छावणी शिबीर १५ मे ते २२ मे या काळात आयोजित केलं जातं. हा देशभरातून आलेल्या तरुणांचा वार्षिक श्रमोत्सव असतो. इथं वेगवेगळी कामं केल्यामुळं तरुणांमध्ये श्रमाचं मूल्य वाढीस लागतं.हे शिबीर सकारात्मक श्रमसंस्कृती, धर्मनिरपेक्ष मूल्य, राष्ट्रीय एकात्मता, पर्यावरण संरक्षण, वैज्ञानिक दृष्टिकोन रुजावा, यासाठी प्रयत्नशील असते.
शिबीरात सहभागी असलेली मुलं विविध विषयातील तज्ञ व्यक्तींसोबत त्या विषयावर चर्चा करत, प्रसंगी वादविवाद करतात. ही मुलं निरनिराळ्या समाजसुधारकांबरोबर मोठमोठ्या द्रष्ट्या व्यक्तींबरोबर वेळ व्यतीत करतात. शिबीरातील दैनंदिन कार्यक्रम असा असतो- सकाळी श्रमदान, दुपारी चर्चा व वादविवाद आणि सायंकाळी सांस्कृतिक कार्यक्रम. बाबा असे म्हणत- शिबीरात सहभागी झालेल्या १५०० युवक-युवतींपैकी एकाने जरी आपला वेळ, बुध्दी व शक्ती विकासाच्या कामी खर्च केली तरी आपल्या शिबीराला प्रचंड यश मिळेल, असं मी म्हणेन.”
आणि ते खरंच होत अशा कितीतरी यशाच्या गाथा सांगता येतील. महाराष्ट्रात नामवंत म्हणून गाजलेली अनिल अवचट, नागेश हडकर,कुमार शिराळकर, कुमार सप्तर्षी, दीनानाथ मनोहर, मुरलीधर शहा,अतुल शर्मा, सोमनाथ रोडे, अशोक बेलखोडे, माधव बावगे, गिरीश कुलकर्णी ही सगळी मंडळी सोमनाथच्या मातीतून घडलेली आहेत. २००८ साली मी पहिल्यांदा या शिबीराला गेलो होतो. त्यावर्षी सोमनाथला बिबट्यांचा त्रास सुरु होता म्हणून शिबीर आनंदवनात झालं ते पहिलंच शिबीर होतं. मी नववीत असताना ‘समिधा’ हे साधनाताई आमटे यांचं आत्मचरित्र वाचलं. ती माझी आनंदवनाशी आणि बाबा आमटेंशी पहिली ओळख. ‘समिधा’ वाचल्यानंतर मी खुओ भारावून गेलो होतो, वेडा झालो होतो.आनंदवन, सोमनाथ, लोकबिरादरी प्रकल्प, हेमलकसा हे सर्व पाहण्याची बाबांना भेटण्याची तीव्र इच्छा मनात जागृत झाली होती. समिधामध्येच मी शिबीराविषयी वाचलं होतं आणि तेव्हापासून शिबीरात जायचं ठरवलं होतं. बाबांसोबत भामरागड साहस सहलीत, दुस-या भारत जोडो यात्रेत आणि पंजाब शांतीयात्रेत सहभागी असलेले माधव बावगे हे आमच्या कुटुंबाचे मित्र व शेजारी आहेत आणि स्वतः सोमनाथ शिबीराचे गेले काही वर्ष संयोजक होते. त्यांच्याच माध्यमातून मी जायचं ठरवलं आणि तो योग दहावीनंतरच्या सुट्ट्यांमध्ये आला;पण तत्पूर्वीच फेब्रुवारीमध्ये बाबांचे निधन झाले होते. त्यांना प्रत्यक्ष पाहता आलं नाही, याचं दुःख आजही आहे.
विदर्भातला उन्हाळा तोपर्यंत फक्त पेपरमध्येच वाचला होता. प्रत्यक्ष तिथे गेल्यानंतर ४० ते ४५ डिग्री कधीकधी ४८ डिग्री तापमान आम्ही अनुभवलं. अशा कडाक्याच्या उन्हाळ्यात तिथं काम करण्याचं थ्रीलही होतं. पहाटे ४ वाजता बाबांच्या गीतांनी शिबीर परिसराला जाग येते. पाच वाजेपर्यंत आवरुन चहा घेऊन सगळे ध्वजाजवळ येतात. ध्वजवंदन झालं की ‘नौजवान आओ रे’, ‘जोडो भारत’ ही गीतं गायली जातात. ग्रुप पाडून ग्रुपनिहाय कामं वाटून दिली जातात.
शेतातली उन्हाळ्यातली वेगवेगळी कामं, तलावातला गाळ काढणे, आनंदवन पध्दतीचे बंधारे बांधणे, खोदकाम, स्वच्छता अशा प्रकारची कामं सांगितली जातात तर दोन ग्रुप जेवणाच्या व्यवस्थेचं आणि निवासाच्या ठिकाणच्या स्वच्छतेचं काम पाहतात.
श्रमदानानंतर आंघोळ करुन आराम झाल्यानंतर दुपारी मार्गदर्शन असते तज्ञ व्यक्तीचे. संध्याकाळी सोमनाथ परिसरात फिरणं, खेळ..इ आणि मग संध्याकाळी जेवण झालं की रात्री सांस्कृतिक कार्यक्रम. नृत्य, गाणं, नाटक, पथनाट्य..अशा वेगवेगळ्या गोष्टी सादर होतात. तसंच वृक्षदिंडीसारखा एक अभिनव कार्यक्रमही इथे सादर होतो. एका सजवलेल्या पालखीत वृक्ष ठेऊन पारंपरिक वाद्यांचा गजर करत ही दिंडी शिबीर परिसरात फिरते व शिबीरात आलेल्या लहान मुलांच्या हस्ते वृक्षारोपण होते.
या शिबीराने आम्हाला काय दिलं,असेल तर या शिबीरामुळं आम्हाला समाजातल्या मुख्य समस्यांची ओळख झाली. आपली समाजव्यवस्था अशी का आहे, प्रॉब्लेम्स काय आहेत..याविषयी विचार करायला सुरुवात होते. शारीरिक कष्टाची कामे करणारी आपल्या आजूबाजूला असंख्य लोक असतात. त्यांना समाजात हलक्या दर्जाचं समजलं जातं;पण इथं आम्हाला श्रमप्रतिष्ठा हे मूल्य समजल. या सा-या श्रमिकांमुळेच, कष्टक-यांमुळेच देश चालतो, ही बाब समजली.
त्यामुळे शिबीराहून परत आल्यानंतर मी शांत राहिलो नाही. स्वस्थ बसलो नाही. वेगवेगळ्या सामाजिक चळवळींमध्ये आणि उपक्रमांमध्ये मी सहभागी झालो. माझा अभ्यास सांभाळून मी शक्य तितके सक्रिय राहण्याचा प्रयत्न करतो नि दरवर्षी शिबीराला जातो.
-घनःश्याम येनगे


Wednesday, September 16, 2015

कवी ना.धों. महानोर

🌷 कवी ना.धों. महानोर यांचा जन्मदिन विशेष 🌷
**************************
संकलन-
शेख सलीम सर
फर्दापूर..
***************************
जीवन -
महानोरांचा जन्म सप्टेंबर १६, इ.स. १९४२ रोजी महाराष्ट्रातल्या वर्तमान औरंगाबाद जिल्ह्यातील पळसखेडे या गावी झाला. त्यांचे शालेय शिक्षण पळसखेडे, पिंपळगाव, शेंदुर्णी येथे झाले. त्यानंतर जळगावातील महाविद्यालयात त्यांनी प्रवेश घेतला; मात्र त्यांचे महाविद्यालयीन शिक्षण पहिल्या वर्षापर्यंतच झाले. महाविद्यालयीन शिक्षण सोडून शेती करायला ते आपल्या गावी परतले.
प्रकाशित साहित्य -
अजिंठा (कवितासंग्रह) दीर्घ
गंगा वाहू दे निर्मळ कविता
जगाला प्रेम अर्पावे कविता
त्या आठवणींचा झोका
दिवेलागणीची वेळ कविता
पळसखेडची गाणी लोकगीते
पक्षांचे लक्ष थवे
पानझड
पावसाळी कविता
यशवंतराव चव्हाण
रानातल्या कविता कविता
शरद पवार आणि मी
शेती, आत्मनाश व संजीवन
चित्रपट गीते -
एक होता विदुषक इ.स. १९९२
जैत रे जैत इ.स. १९७७
निवडुंग
राजकीय कारकीर्द -
महाराष्ट्र विधान परिषदेवर नियुक्त सभासद म्हणून महाराष्ट्र शासनाने महानोरांची शिफारस केल्यावर इ.स. १९७८ साली ते महाराष्ट्र विधान परिषदेचे सदस्य झाले.
पुरस्कार -
कुसुमाग्रज प्रतिष्ठानचा जनस्थान पुरस्कार, इ.स. २००९
साहित्य अकादमी पुरस्कार, इ.स. २००० - 'पानझड'

Monday, August 24, 2015

माझा गाव - बा. भ. बोरकर


निळ्या खाडीच्या काठाला
माझा हिरवाच गाव.
जगात मी मिरवितो
त्याचे लावुनिया नाव !

पूल ओलांडिता पुढे
रस्ता येईल तांबडा.
घरी आणील सरळ
जरी दिसला वाकडा.

माणसांच्या जागीसाठी
दाटी करितात माड.
गर्द मधेच एखादे
आंब्या फणसाचे झाड.

असो झाडी किंवा वाडी
सुने नाही वाटायचे.
नादी आपुल्याच कोणी
तेथे गात असायचे.

थोडया पायवाटा हिंडा
लालतांबडया वाकडया.
होडया उपडया झालेल्या
तशा बघाल टेकडया.

जेथे होईल माध्यान्ह
तेथे पान वाढलेले.
काळोखात कुणीतरी
ज्योत घेउन आलेले.

गोव्यतला माझा गाव
असा ओव्यांतच गावा.
तेथे जावून राहून
डोळे भरून पाहावा.

Sunday, July 26, 2015

मराठी नाटक……………………दोन स्पेशल

खुप दिवसापासूनची इच्छा होती "दोन स्पेशल" नाटक पहायची ती आज पूर्ण झाली. खर तर नाट्यगृहामधे जाऊन पहिलेलं आतापर्यंतच हे माझं तिसरच नाटक, तशी नाटकाची उत्सुकता होतीच, पण इतरांकडून ऐकलेलं समालोचन आणि नाटकाबद्दलच मत ऐकून ती अजूनच वाढली। तस प्रसाद सर ( प्रसाद ओक ) म्हटल्याप्रमाणे बाहुबली चित्रपटा इतकेच हे नाटक कौतुकास्पद आहे. एक अविस्मरणीय वीकेंड बनून जातो. कथा ही १९८९ च्या हिन्दुस्तान दैनिक पत्रकाराची, पत्रकारितेची आणि मिलिंद भागवत ( जितु दादा ) याच्या तत्वाची, कथानक खूपच गुंतवून ठेवनारे आहे, संवादाबद्दल तर बोलायचे म्हटले तर दररोजचे चित्रपटांचे बर्गर खाऊन कंटाळा आल्यावर अचानक कोणीतरी पंच पक्वान्नाच आमंत्रण द्याव तसे आहेत.

नाटक पाहत असताना ते आपल्याला त्या काळात नेऊन ठेवते ज्यावेळी बॉलपेनचा नुकताच शोध लागलेला असतो, ते वाजणारे जुने फोन वगैरे. सहअभिनेता पण खूपच भाव खाऊन जातो अगदी शेवटच्या संवादा पर्यंत. पहिल्या अंकापर्यंत लवस्टोरी मधे मिलिंद भागवत ( जितेंद्र जोशी ) बद्दल जास्त आपुलकी वाटते पण दुसऱ्या अंकात सर्व काही उलगडत जाते.

मला आवडलेले काही संवाद,
संवाद १.  ( स्वप्ना  हिन्दुस्तान दैनिक हातात घेतल्यावर )
स्वप्ना ( गिरिजा ओक ) : अरे तू शब्द कोडी पण बनवतोस?
मिलिंद ( जितु दादा ) : काही लोक प्रेमाभंग झाल्यावर कविता करतात अन मी शब्दकोडी बनवतो.

संवाद  २. ( स्वप्ना जूना पेन पाहताना )
स्वप्ना ( गिरिजा ओक ) : अरे हा पेन तू अजुन जपून ठेवलास ?
मिलिंद ( जितु दादा ) : आपल्या प्रेमपेक्षा हां पेनच जास्त टिकला.

मला आवडलेल वाक्य
 " आपल्या जवळच्या माणसाला आपले दुःख सांगितले की आपले मन हलके होते पण त्याची काळजी वाढत जाते. "

नाटकाचा शेवटचा संवाद तर तिकीटाचे पैसे वसूल करणारा आहे, तो मी इथे सांगत नाही तो तुम्ही नाट्यगृहात जाऊनच पहा.

नाटक संपल्यावर जितुदादा सोबत मी,

Thursday, July 16, 2015

गवतफुला

गवतफुला- इंदिरा संत

रंगरंगुल्या, सानसानुल्या,
गवतफुला रे गवतफुला;
असा कसा रे मला लागला,
सांग तुझा रे तुझा लळा.
मित्रासंगे माळावरती,
पतंग उडवित फिरताना;
तुला पाहिले गवतावरती,
झुलता झुलता हसताना.
विसरुनी गेलो, पतंग नभीचा,
विसरून गेलो मित्राला;
पाहून तुजला हरखुन गेलो,
अशा तुझ्या रे रंगकळा.
हिरवी नाजुक, रेशिम पाती,
दोन बाजुला सळसळती;
नीळ निळुली एक पाकळी,
पराग पिवळे झगमगती.
तळी पुन्हा अन गोजिरवाणी,
लाल पाकळी खुलते रे;
उन्हामध्ये हे रंग पाहता,
भानच हरपुनी गेले रे
पहाटवेळी आभाळ येते,
लहान होउनी तुझ्याहुनी;
तुला भरविते निळ्या करांनी,
दवमोत्यांची कणी कणी.
वारा घेवूनी रूप सानुले,
खेळ खेळतो झोपाळा;
रात्रही इवली होऊन म्हणते
अंगाईचे गीत तुला.
गोजिरवाणा हो रवीचा कण
छाया होते इवलीशी;
तुझ्या संगती लपून खेळते,
रमून जाते पहा कशी.
तुझी गोजिरी, शिकून भाषा,
गोष्टी तुजला सांगाव्या;
तुझे शिकावे खेळ आणखी,
जादू तुजला शिकवाव्या.
आभाळाशी हट्ट करावा
खाऊ खावा तुझ्यासवे;
तुझे घालुनी रंगीत कपडे,
फुलपाखरां फसवावे.
मलाही वाटे लहान व्हावे
तुझ्याहूनही लहान रे;
तुझ्या संगती सदा रहावे,
विसरुनी शाळा घर सार..


Monday, June 29, 2015

बाळकृष्ण हरी कोल्हटकर

(बाळ कोल्हटकर आणि वसंतराव देशपांडे)

महाराष्ट्राचे लाडके नाटककार, उत्कृष्ट भावनाप्रधान भूमिका करणारे नट बाळकृष्ण हरी तथा बाळ कोल्हटकर म्हणजे नाटयसृष्टीतला एक मानबिंदू. बाळ कोल्हटकरांचा जन्म २५ सप्टेंबर रोजी सातारा येथे झाला. शिक्षण जेमतेम सातवीपर्यंतच झाले. लहानपणापासून नाटकांची अतिशय आवड. तसेच लेखनाचीही आवड होती. त्यामुळे लहानपणीच त्यांच्या लेखनाला सुरुवात झाली. वयाच्या अवघ्या १५ व्या वर्षी त्यांनी "जोहार" हे आपले पहिले नाटक लिहिले. 

१९४७ पर्यंत त्यांनी रेल्वे खात्यात नोकरी केली. त्यानंतर लेखनासाठी आणि रंगभूमीसाठी त्यांनी आपले पुढील आयुष्य वाहून घेतले. त्यांनी लिहिलेली नाटकं ही भावनाप्रधान आणि कौटुंबिक अशी असत. ज्यांना पुर्वी लोक हसायचे आणि टिंगल करायचे असे बाळ कोल्हटकर प्रेकक्षांची नस नेमकी ओळखत असत. त्यांच्या नाटकातील प्रसंग भले बेतलेले असोत थोडेसे अती भावनिक असोत पण सामान्य प्रेक्षकांना अश्रु पुसायला लावत.

त्यांची बरीच नाटकं अतिशय लोकप्रिय झाली. बर्‍याच नाटकांचे हजाराच्या वर प्रयोग झाले. व्यवसायिक रंगभूमीसाठी त्यांनी नाटकं लिहिली होती तरी प्रत्येक नाटकातून काही मूल्य जपली होती. "दुरितांचे तिमिर जावो" या नाटकांचे पंधराशे प्रयोग, 'वाहतो ही दुर्वाची जुडी' या नाटकाचे चौदाशे प्रयोग, मुंबईची माणसे' याचे जवळपास दोन हजाराच्या वर तर 'एखाद्यांचे नशीब' या नाटकांचे हजारावर प्रयोग झाले. यावरुन नाटककार म्हणून लोकांनी त्यांच्यावर किती प्रेम केले याची साक्षच पटते. 

बाळ कोल्हटकर हे अंबरनाथच्या खेर विभागात १९५९ ते १९७२ या काळात वास्तव्यास होते. त्यांनी खेर विभागातील प्रसिद्ध हेरंब मंदिरात 'वाहतो ही दुर्वांची जुडी', 'वेगळं व्हायचंय मला', अशी काही प्रसिद्ध नाटकं लिहिली तसेच सीमेवरुन परत जा, लहानपणा देगा देवा, देव दीनाघरी घावला, देणार्‍याचे हात हजार, उघडलं स्वर्गाचे दार, इत्यादी त्यांची गाजलेली नाटके. त्यांनी एकंदर ३० हून अधिक नाटके लिहिली. 

सर्वसामान्य प्रेक्षकांच्या आवडीची कल्पना असलेल्या कोल्हटकरांनी मध्यमवर्गीय कुटूंबातील प्रश्न हाताळणारी सुखांत नाटकेही लिहिली. प्रेक्षकांना जे हवे, जे आवडते ते त्यांनी रंगभूमीवर उभे केले. ते उभे करताना कथानकाची सुसूत्रतेनी बांधणी, काव्यात्मक संवाद आणि सुभाषितवजा टाळी घेणारी काही वाक्ये याचा त्यांनी प्रयत्नपूर्वक उपयोग करुन नाटकं यशस्वी केली. 

नाटककारांच्या बरोबरीने ते रंगभूमीचे उत्कृष्ट नटही होते. त्यांनी केलेल्या भूमिका अतिशय गाजल्या त्या आजही लोकांच्या आठवणीत जशाच्या तशा आहेत. हेच एका नाटककाराचे आणि नटाचे मोठेपण आहे. अशा या ज्येष्ठ नाटककाराचे ३० जून १९९४ रोजी निधन झाले.

अंबरनाथ वासीयांचे कोल्हटकरांवर त्यांच्या कविता आणि नाटकांवर विशेष प्रेम याच प्रेमापोटी अंबरनाथमध्ये २००९ - १० च्या दरम्यान बाळ कोल्हटकर ज्येष्ठ नागरिक कट्टा तयार करण्यात आला. खेर विभागातील कोल्हटकरांचा 'भूषण' हा बंगला आजही त्यांची आठवण अंबरनाथकरांना करून देतो.

Wednesday, June 24, 2015

मेणवली घाट , वाई -सातारा

 मेणवली घाट , वाई -सातारा

आपण हा घाट अनेक हिंदी चित्रपटांमधे पाहिला असेलच ,
उत्तरप्रदेश,बिहार मधील गावांची नावे वापरली जातात
पण शुटींग मात्र इथेच (आपल्या साताऱ्यात) होत असते
वाईपासून तीन किलोमीटर अंतरावर मेणवली गाव आहे.
या गावाला पर्यटनस्थळ म्हणून प्रसिद्धी मिळाली
ती नाना फडणवीसांनी कृष्णा नदीच्या काठावर बांधलेल्या
भव्य वाड्यामुळे आणि काठावरील मंदिरांमुळे.
फडणवीसांनी मेणवलीत वाडा, अमृतेश्वर मंदिर, विष्णू-लक्ष्मी
(मेणवलेश्वर) मंदिर आणि कृष्णानदीवर घाट बांधला.
नानांचा वाडा गढीवजा असून मराठी वास्तुशैलीचा हा एक उत्कृष्ट नमुना आहे.
वाड्याला बाजूने उंच तटबंदी केलेली आहे. नक्षीकाम केलेली पाण्याची कुंडेही पाहावयास मिळतात.
या ठिकाणाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे वाड्यात असणाऱ्या
जवळजवळ सर्वच खोल्यांमध्ये वेगवेगळ्या पौराणिक कथांवर आधारित चित्रे रेखाटली आहेत.
इसवीसन १७७० ते १८०० या दरम्यान काढलेली ही चित्रे आवर्जून पाहण्यासारखी आहेत.
या सर्वांपेक्षा वेगळे चित्र लक्ष वेधून घेते ते म्हणजे मस्तानीला समोर बसवून काढलेले तिचे चित्र.
सातारा ते मेणवली अंतर ३६ किलोमीटर आहे.
वाईपासून पुढे मेणवलीला जाता येते.
या गावाच्या घाटावरील प्रचंड घंटा हेही एक आकर्षणकेंद्र असून,
वाईप्रमाणेच याही गावाला चित्रीकरणासाठी पसंती दिली जाते.
अभिमान वाटला पाहिजे इतकी सुंदर निसर्ग
आणि तितक्याच तोडीची पर्यटन स्थळे आपल्या महाराष्ट्रात आहेत

Thursday, June 11, 2015

आनंदलोक - कुसुमाग्रज

माझ्या आनंदलोकात
चंद्र मावळत नाही
दर्या अथांग प्रेमाचा
कधी वादळत नाही


माझ्या आनंदलोकात
केले वसंताने घर
आंब्या-आंब्याच्या फांदीला
फुटे कोकिळेचा स्वर


सात रंगांची मैफल
वाहे येथे हवेतून
येथे मरणही नाचे
मोरपिसारा होऊन.

Thursday, April 16, 2015

तरीही वसंत फुलतो

प्रत्येक जन्मणारा क्षण शेवटास ढळतो
तरीही वसंत फुलतो.......................!!

उमले फुले इथे जे, ते ते अखेर वठते
लावण्य, रंग, रूप, सारे झडून जाते
तो गंध, तो फुलोरा, अंती धुलिस मिळतो
तरीही वसंत फुलतो.......................!!

जे वाटती अतूट, जाती तुटून नाते
आधार जो धरावा, त्यालाच कीड लागे
ऋतू कोवळा अखेरी, तळत्या उन्हात जळतो
तरीही वसंत फुलतो.......................!!

तरीही फिरून बीज, रुजते पुन्हा नव्याने
तरीही फिरून श्वास, रचती सुरेल गाणे
तरीही फिरून अंत, उगमाकडेच वळतो.......
उगमाकडेच वळतो..........................!!

प्रत्येक जन्मणारा क्षण शेवटास ढळतो
तरीही वसंत फुलतो.......................!!

   --- सुधीर मोघे

Wednesday, March 4, 2015

सकाळ २५ फेब्रुवारी २०१५ ...आणि पुन्हा सुरू झाला प्रवास. कष्टाकडून... कष्टाकडे!

उसाची गाडी ओढताना बैलाचे पाय घसरत आहेत, याची कल्पना आल्यानंतर गाडीवान खाली उतरला. त्याने बैलांचे कासरे कारभारणीच्या हातात दिले. पण जे व्हायचे ते झालेच.
 

धन्याने दुसऱ्या बैलाची वेसण सोडली आणि खाली पडलेल्या बैलाला उठविण्याचा प्रयत्न सुरू केला. या आणीबाणीच्या प्रसंगाने गाडीवर मागे बसलेल्या मुलांकडे दुर्लक्ष करण्यास कारभारणीला भाग पाडले.
 

एका हाताने यश येत नाही म्हटल्याने धन्याने दोन्ही हातांनी बैलाला उठविण्याचा प्रयत्न चालविला. तर गाडीवर उभारलेल्या मालकीणीनेही कासरा ओढून हातभार लावला.

बैलाची जिद्द आणि धनी व मालकीणीचे प्रयत्न याची परिणती म्हणजे बैल गुडघ्यावर उभा राहिला.

 बैल उठून उभारल्यानंतर धन्याने प्राधान्य दिले ते बैलाला ‘सापती‘ नव्याने बांधण्याला. तर गाडीवानाची जबाबदारी यशस्वीपणे पार पाडल्यानंतर मालकीणीनेही गाडीवर मागे बसलेल्या चिल्ल्यापिल्ल्यांना सावरले.
 
....आणि पुन्हा सुरू झाला प्रवास. कष्टाकडून... कष्टाकडे!

Wednesday, February 25, 2015

ऋतू येतील जातील

ऋतू येतील जातील
आणि आयुष्य सरेल
फक्त संचिताचे सार
पुढे श्वासात उरेल

असे मन माझे
ओढ़ते मला की
आभाळाचा जीव
मातीशी जडावा

जसा उगवतो सूर्य
अंधार फोडून
तसा सूर्य माझा
गगनी भिरावा

असे झाड़ लाभो
माझ्या या गाण्याला
जिथुन आभाळी
गरुड़ उड़ावा

चित्रपट :- सुम्बरान

Tuesday, February 24, 2015

फेसबुकवर म्हणी .. just creativity

like नको पण comment आवर..

छोट्या पोस्टला like चा आधार..

आपले profile hidden आणि दुसऱ्याचे profile वर graph search..

post मुलीची पण comment फार....

एकमेका like करू अवघे होऊ प्रसिद्ध...

post वाचून comment द्याव्यात...

अडला हरी( naw fb user) कोणालाही like करी....

username पेक्षा password जड..

पोस्ट तिथे लाईक...

अतिशहाणा त्याचा cover page रिकामा..

असतील like तर  जमतील comment..

आंधळा मागतो एक  like देव देतो दोन comments..

पोस्टच नाही तर like कुठून ?

पोस्ट profile pic ची आणि like कवर page ला...

आधी like नंतर comment...

आपलीच पोस्ट आणि आपलेच like...

इकडे post तिकडे share

उठता like बसता share

उचलला फोटो लावला कवर page वर

पोस्ट गोड वाटली म्हणून सगळीकडे share करत फिरू नये.

---- एक वाटाड्या ( प्रमोद)  

Friday, February 20, 2015

जब तक है व्हाट्सप्प

तेरे डी पी की नमकीन मस्तियाँ,
तेरे इमोटिकॉन्स की बेपरवाह गुस्ताखियाँ,
तेरे शेर किये हुए वीडिओज़ की लहराती अंगड़ाईयाँ,
नहीं भूलूंगा मै,
जब तक है व्हाट्सप्प, जब तक है व्हाट्सप्प.

तेरा ये CHAT पे  CHAT  छोडना,
तेरा ये चैटिंग से रुख मोड़ना,
तेरा ऑनलाइन फिरसे ना होना,
नहीं माफ़ करूँगा मै,
जब तक है व्हाट्सप्प, जब तक है व्हाट्सप्प.

थोडीसी ख़ुशी पे  ग्रुप में तेरे ये बेधड़क नाचने से,
हर एक लिखित संदेशो पे रुठने से,
छोटी छोटी तेरी SMILY वाली हसी से,
मोहोब्बत करूँगा मैं,
जब तक है व्हाट्सप्प, जब तक है व्हाट्सप्प.

तेरे झूठे स्टेटस से,
तेरा झूठा ग्रीन डॉट ऑनलाइन आइकॉन से,
तेरे बिना मतलब के मैसेजेस पे,
नफ़रत करूँगा मै,
जब तक है व्हाट्सप्प, जब तक है व्हाट्सप्प.

--- एक वाटाडया( प्रमोद )

Friday, February 13, 2015

बघ माझी आठवण येते का ?

बघ माझी आठवण येते का ?

फेसबुक वर लॉगीन कर
माझे प्रोफाईल ओपन कर, लाईक कर
बघ माझी आठवण येते का ?


आपला जुना अल्बम उघड
लाईक किती झाले बघ
सगळ्या कमेंट वाच
बघ माझी आठवण येते का ?

फोटो पाहता पाहता
एक व्हिडीओ दिसेल
नेट स्लो असेल बफरींग साठी तर १०जी रेचार्ज कर मग व्हिडीओ पहा
बघ माझी आठवण येते का ?

टाईमलाईन उघड
आपले मुचुअल मित्र पहा
बघ माझी आठवण येते का ?

मासेज बॉक्स उघड
माझे जुने संभाषण वाच
बघ माझी आठवण येते का?

माझ्या टाईमलाईन वर जा
ब्लोग लिंक दिसेल
ब्लोग ओपन करून जुन्या कविता वाच
बघ माझी आठवण येते का?

नको नको लगेच लॉगआउट होऊ नकोस
बटरी चार्ज कर पुन्हा ऑन लाइन ये.
बघ माझी आठवण येते का?

to be continued......................
                                                                         --------------------- एक  वाटाड्या ( प्रमोद)

Tuesday, January 27, 2015

3 ways Steve Jobs made meetings productive



Here are three ways the iconic CEO made meetings super productive.

1. He kept meetings as small as possible.
In his book “Insanely Simple,” longtime Jobs collaborator Ken Segall detailed what it was like to work with him.
In one story, Jobs was about to start a weekly meeting with Apple’s ad agency.
Then Jobs spotted someone new.
“He stopped cold,” Segall writes. “His eyes locked on to the one thing in the room that didn’t look right. Pointing to Lorrie, he said, ‘Who are you?'”
Calmly, she explained that she was asked to the meeting because she was a part of related marketing projects.
Jobs heard her, and then politely told her to get out.
“I don’t think we need you in this meeting, Lorrie. Thanks,” he said.
He was similarly ruthless with himself. When Barack Obama asked him to join a small gathering of tech moguls, Jobs declined — the President invited too many people for his taste.

2. He made sure someone was responsible for each item on the agenda. 
In a 2011 feature investigating Apple’s culture, Fortune reporter Adam Lashinsky detailed a few of the formal processes that Jobs used, which led Apple to become the world’s most valuable company.
At the core of Job’s mentality was the “accountability mindset” — meaning that processes were put in place so that everybody knew who was responsible for what.
As Lachinsky described:
Internal Applespeak even has a name for it, the “DRI,” or directly responsible individual. Often the DRI’s name will appear on an agenda for a meeting, so everybody knows who is responsible. “Any effective meeting at Apple will have an action list,” says a former employee. “Next to each action item will be the DRI.” A common phrase heard around Apple when someone is trying to learn the right contact on a project: “Who’s the DRI on that?”
The process works. Gloria Lin moved from the iPod team at Apple to leading the product team at Flipboard — and she brought DRIs with her.
They’re hugely helpful in a startup situation.
“In a fast-growing company with tons of activity, important things get left on the table not because people are irresponsible but just because they’re really busy,” she wrote on Quora. “When you feel like something is your baby, then you really, really care about how it’s doing.”

3. He wouldn’t let people hide behind PowerPoint.
Walter Isaacson, author of the “Steve Jobs” biography, said, “Jobs hated formal presentations, but he loved freewheeling face-to-face meetings.”
Every Wednesday afternoon, he had an agenda-less meeting with his marketing and advertising team.
Slideshows were banned because Jobs wanted his team to debate passionately and think critically, all without leaning on technology.
“I hate the way people use slide presentations instead of thinking,” Jobs told Isaacson. “People would confront a problem by creating a presentation. I wanted them to engage, to hash things out at the table, rather than show a bunch of slides. People who know what they’re talking about don’t need PowerPoint.”


Source: link

Thursday, January 8, 2015

कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती - हरिवंश राय बच्चन

लहरों से डर कर नौका पार नहीं होती,
कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती ।



नन्हीं चींटी जब दाना लेकर चलती है,
चढ़ती दीवारों पर, सौ बार फिसलती है ।
मन का विश्वास रगों में साहस भरता है,
चढ़कर गिरना, गिरकर चढ़ना न अखरता है ।
आख़िर उसकी मेहनत बेकार नहीं होती,
कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती ।



डुबकियां सिंधु में गोताखोर लगाता है,
जा जा कर खाली हाथ लौटकर आता है ।
मिलते नहीं सहज ही मोती गहरे पानी में,
बढ़ता दुगना उत्साह इसी हैरानी में ।
मुट्ठी उसकी खाली हर बार नहीं होती,
कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती ।


असफलता एक चुनौती है, इसे स्वीकार करो,
क्या कमी रह गई, देखो और सुधार करो ।
जब तक न सफल हो, नींद चैन को त्यागो तुम,
संघर्ष का मैदान छोड़ कर मत भागो तुम ।
कुछ किये बिना ही जय जय कार नहीं होती,
कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती ।

Wednesday, January 7, 2015

New Year Resolution ideas for Cyclists

New Year Resolution ideas for Cyclists


New Year is often term as time of rebirth, where we get chance to correct ourselves and start a fresh. 

Usually, being a cyclist we always come up with general ideas like “Yes, I am going to ride bike daily”, “I will bike to work ” and so on. But how often we seriously do that. Have you ever think of, why our new year resolution just vanish away in nearly 2-3 months. As an Cyclist or an human being it’s very important to make your resolution more specific. We would like to share some fantastic idea for your New Year resolution, which keeps you on your bike always. So, here we go…
Riding your bike daily
It’s difficult to develop new habit, and more difficult when we know that it is a good one. In case of bicycling, we must start riding it slowly at our own pace. Like, riding to nearby grocery store, hangout with friends, visiting neighbors or riding it as a part of morning exercise. These small rides will help you to go out with your bike and to use your bike more efficiently.
Stay safe

This resolution is for every cyclist. Although, generally riders take proper safety attention whenever they leave for ride. Some basic safety equipment are helmet, first aid kit, head and tail light. Apart from these accessories it is also very important to ride bike only on bike lane, this tip become more important if there is no bike lane available in your city.
Bike to work

This is the perfect new year resolution for those who are not Professional rider and also for those who knows how important to ride a bike. We believe there are many hobby cyclist take pledge to go office by bike but only few continue it through out the year. There might be n number of reason to get off the bike but the important factor will be how many times you pick bicycle again to go for work.

Participating in an event

Whether it’s a small community ride or a professional race, you must participate. There are many benefits of taking part in these events, it helps in networking, finding people of same hobby and increasing your own skills. Many people join small group bunch of 10-15 cyclist who keep exploring places.
Breaking your own record of pedaling

The idea of this new year resolution that breaking your own record of pedaling is how many more miles you cover in riding. Whether you record your ride on some app like garmin, strava or using offline journal like BikeTrails, one thing you must see how much you are riding, does you are able to accomplish your set target or not, keep moving. Do not stop any where.

Alright, this is all about new year resolution ideas for the cyclists in you, about us we are also taking one resolution that is, To provide you as much as help we can, so that you can ride it smoothly. This year we are also committed to come up with Cycling forum for you. We would like to hear any good idea of resolution you have in comment box below. Once again Wishes for new year. Keep Pedaling. Ride Safe. - Regards stopnowhere.in 
In Association with Amazon.in