Amazon

Saturday, July 26, 2014

Poem by Piyush Mishra


Thursday, July 3, 2014

This called as truth of life.....

एके दिवशी एका शेतक-याचं गाढव
शेतातल्या कोरड्या विहिरीत पडलं.
जखमी झाल्यामुळे ते विव्हळत होतं
आणि मोठ्याने ओरडत होतं.
लोकं जमा झाले शेतकरी धावत आला त्याने
बराच विचार केला फार प्रयत्न केले.
त्या गाढवाला त्या विहीरीतून बाहेर काढण्याचे
पण काही करता त्याला बाहेर काढणे जमत नव्हते.
दिवस मावळायला आला होता
शेतकरीही आता थकला ही होता आणि कंटाळला होता त्याने
विचार केला .
'आता हे गाढव तर असेही म्हातारे
झाले आहे असेही निरुपयोगी आहे
आणि ती विहिरही कोरडीचं आहे ...
त्याला बाहेर काढण्या पेक्षा त्याला बुजून द्यावे..
विहीरीत माती लोटावी...
गाढवाचा प्रश्न ही सुटेल
आणि शेतातली ही विहीरही बुजली जाईल.......'
मग काय जमलेल्या सार्या लोकांकडून त्याने
मदत मागीतली. आणि सगळे कामाला लागले
कुदळ फावड्यांनी माती टाकायला सुरुवात झाली.....
मध्ये पडलेल्या त्या जखमी गाढवाला काही कळेनासे झाले ...
विहीरीत पडल्याने शरीराला झालेल्या जखमांची वेदना आणि त्यात
भर म्हणजे आयुष्यभर ज्या मालकाची चाकरी केली
त्याची ओझी वाहीली आज तोचं मालक जिवावर उठला ...
ते दुखाने अजून मोठयाने ओरडू लागले....
वरुन माती पडतचं होती...
काही वेळाने गाढवाचा ओरडण्याचा आवाज थांबला .....
सागळ्यांना वाटले गाढव मेलेचं बहुतेक
शेतक-याने सहज विहीरीत डोकावून पाहीले
तर
तो पहातचं राहीला...
अंगावरची माती झटकत गाढव उभे राहीले होते...
लोकांनी अजून पटापटा माती टाकणे सुरु केले...
परत पाहीले तर गाढव त्याचा त्याचा मग्न होता तो वरुन
माती पडली की झटकायचा आणि त्या पडलेल्या
मातीच्या थरावर उभा राहीचा ......
असं करता करता कोरडी विहीर बरीचं
भरली आणि कठडा जवळ येताचं ते गाढव
तो कठडा ओलांडून बाहेर आले......
आयुष्यात वेगळे तरी काय होतं ???
आपण खड्यात पडलो तर आपणास
काढायला कोणीतरी एकचं येते पण
आपल्यासाठी खड्डे खणणारे आणि खड्यात
पडल्यावर माती लोटणारे
आपल्याला गाडण्याचा प्रयत्न करणारे बरेचं भेटतात...
म्हणून स्वतःवर नेहमी विश्वास ठेवा ....
आपले डोके नेहमी शांत ठेवा
समस्या कीतीही मोठी असो....
शांत मनाने ती हाताळा....
खड्ड्यात पडलो आणि कोणी पाडलं ह्या बद्द्ल
दुखः करायपेक्षा त्यातून बाहेर कसे पडायचे हा विचार करा.....
झटका ती माती आणि त्या मातीची एक एक पायरी करत...
हळूहळू करत वरया............