Amazon

Friday, October 7, 2011

रजनी. The Name is enough.


गणपतीच्या घरी 10 दिवस रजनीकांतची स्थापना केली जाते.



संता आणि बंता हे दोघे रजनीकांतला 999 कोटी रुपये भेट देणार आहेत. टोकन मनी म्हणून.. लोकांचं लक्ष त्यांच्यावरून उडवल्याबद्दल.



एकदा क्रिकेट खेळत असताना रजनीकांतने एक चेंडू फक्त स्थिर बॅटने नुसताच तटवला.. आज त्या चेंडूला लोक प्लुटो या नावाने ओळखतात.



अशोक चव्हाणांना का जावे लागले? ते हल्ली ब-याच भाषणांमध्ये जाहीरपणे म्हणाले होते, ‘रजनी कान्ट!’



एकटय़ाने समूहगीत कोण गाऊ शकतो?अर्थातच रावण यार! प्रत्येक गोष्ट रजनीकांत कसा करेल?



रजनीकांतने एकदा ठरवलं की आपल्याकडचं किमान एक टक्का ज्ञान तरी जगाला द्यायचं.. त्यातूनच ‘गुगल’चा जन्म झाला.



एक ईमेल पुण्याहून मुंबईला पाठवलं गेलं.. रजनीकांतने ते लोणावळय़ातच अडवलं म्हणे!



रजनीकांत एकदा चेन्नईमध्ये मॉर्निग वॉकसाठी बाहेर पडला, दुपारी त्याला अमेरिकन पोलिसांनी अटक केली.. बिना पासपोर्ट-व्हिसा अमेरिकेत प्रवेश केल्याबद्दल.



एक भूत मध्यरात्री 12 वाजताच्या ठोक्याला दुस-या भुताला म्हणालं, ‘‘उगाच थरथर कापू नकोस. वेडय़ासारखं घाबरू नकोस. हे सगळे मनाचे खेळ असतात. रजनीकांत वजनीकांत जगात काहीही नसतं!’’



एक दिवस रजनीकांत सूर्याकडे एकटक पाहात राहिला.. शेवटी सूर्याचीच पापणी लवली.



‘रोबो’ सिनेमा हिट झाला, तेव्हा रजनीकांतने ‘टाइम्स ऑफ इंडिया’ला चार स्टारचे रेटिंग दिले.



देवाला जेव्हा जेव्हा मानसिक धक्का बसतो, तेव्हा तो ‘अरे रजनीकांता’ असे उद्गारतो.



रजनीकांत घडय़ाळ घालत नाही. कोणत्याही वेळी किती वाजलेत, हे तोच ठरवतो.



त्सुनामी कशा तयार होतात.. अर्थातच, समुद्राच्या पोटात भूकंप झाल्यामुळे.. प्रत्येक गोष्ट रजनीकांत करेल की काय?



लहानपणी रजनीकांतची खेळणी एकदा हरवली.. ती जागा आज ‘एस्सेलवर्ल्ड’ म्हणून प्रसिद्ध आहे.



न्यायदेवतेने एकदा रजनीकांतकडे क्रुद्ध नजरेने रोखून पाहिले होते.. ती आजतागायत आंधळी आहे.



रजनीकांत खिडकी उघडी ठेवून एसी चालू करतो, तेव्हा देशात हिवाळा सुरू होतो.



रजनीकांतशी गप्पा मारताना.. राज ठाकरेही तामिळ बोलतात.



पॉवर ऑफ रजनीकांत! तुम्ही रजनीकांतचा जोक एका माणसाला फॉरवर्ड करता.. तो एका तासात एक कोटी माणसांपर्यंत पोहोचतो.



इजिप्तमधील पिरॅमिड हे खरेतर रजनीकांतचे चौथीतले भूगोलाचे प्रोजेक्ट्स आहेत.



रजनीकांतचा फोन व्हायब्रेटर मोडवर असला, तरी कोयना धरणाला धोका नाही.
-कार्यकारी अभियंता, कोयना धरण विभाग



मुंबईतली वीज कधी कधी अचानक थोडय़ा वेळासाठी गायब होते.. कारण, तेव्हा रजनीकांतने आपला फोन चार्जिगला लावलेला असतो.



रजनीकांतने एक दिवस शाळेला बुट्टी मारली.. शाळेने तो दिवस रविवार असल्याचे जाहीर करून टाकले.



रजनीकांतला एकदा एका रिपोर्टरने विचारले, ‘‘मोबाइल आणि इंटरनेटवर फिरणाऱ्या रजनीकांत जोक्सविषयी तुझं मत काय?’’रजनीकांतने गंभीरपणे प्रतिप्रश्न केला, ‘‘तुला खरंच वाटतं की ते काल्पनिक विनोद आहेत म्हणून?’’



संता-बंता आत्महत्या करणार आहेत. रजनीकांतमुळे आपल्याकडे कुणी लक्षच देत नाही, अशी त्यांची तक्रार आहे.



रजनीकांत एका मुलाबरोबर पत्ते खेळत होता. रजनीकांतकडे तीन एक्के होते. तरीही तो डाव हरला.. का?कारण त्या मुलाकडे तीन रजनीकांत होते.



रजनीकांतच्या घरी मादाम तुसॉचा मेणाचा पुतळा आहे.



प्रागैतिहासिक काळात डायनॉसोरांनी रजनीकांतकडून पैसे उसने घेतले होते, ते परतच केले नाहीत.. तेव्हापासून आजतागायत डायनॉसोर कोणाला दिसलेले नाहीत.



एकदा एका ट्रेनची सायकलशी टक्कर झाली आणि ट्रेन रुळावरून घसरली.. सायकलचालक रजनीकांत फरारी झाला आहे.



रजनीकांतने एकदा पाकिस्तानातल्या एका अतिरेक्याला ठार मारले.. भारतात बसून, ब्लूटुथवरून.



‘‘बेटा रजनीकांत आपल्या सोलर वॉटर हीटरमधून गार पाणी येतंय रे,’’ आईने ओरडून सांगितले.
रजनीकांत तडक छतावर गेला आणि सूर्य दुरुस्त करून आला.



रजनीकांतच्या गर्लफ्रेंडने एकदा त्याला सांगितलं, ‘‘मला सतत अशी भावना होते की कुणीतरी माझा पाठलाग करतंय.’’दुस-या दिवशी अचानक ती चित्कारली, ‘‘माय गॉड, माझी सावली कुठे गेली?’’



प्राध्यापकाने एका मुलाला विचारले, ‘‘तुला भविष्यात काय करायचे आहे?’’मुलगा उत्तरला, ‘‘एमबीबीएस झाल्यावर आयएएसची परीक्षा देऊन पोलिस फोर्समध्ये जायचंय. नंतर चांगल्या सॉफ्टवेअर कंपनीमध्ये नोकरी करता करता उत्तम वकील म्हणून नाव कमावायचंय. भव्य बिल्डिंग उभारून मॉलिक्युलर बायोलॉजीमध्ये संशोधन करून नोबेल मिळवायचंय आणि अभिनयाचं ऑस्कर.’’प्रोफेसर म्हणाले, ‘बाप रे, तुझं नाव काय?’’
‘‘सजनीकांत.. सन ऑफ रजनीकांत.’’



‘‘आई आई, तो बघ तारा तुटला!’’
‘‘नाही रे बाळा, आजकाल काही भरवसा नाही. रजनीकांतने एखादा दगड फेकून मारला असेल सूर्याला नाहीतर चंद्राला!’’



एकदा एका माणसाने रजनीकांतच्या प्रेयसीची छेड काढली.. आज जग त्याला बॉबी डार्लिग या नावाने ओळखते.



एकदा रजनीकांत पावसात क्रिकेट खेळत होता.. त्या दिवशी खेळामुळे पाऊस थांबवण्यात आला.



एकदा रजनीकांतने दोन हत्ती, दोन ऊंट, दोन घोडे पाळले आणि लष्कराकडून काही सैनिक मागवून घेतले.. त्याला बुद्धिबळ खेळण्याची हुक्की आली होती.



एकदा जेम्स बाँडने एका माणसावर गोळी झाडली आणि तो म्हणाला, ‘‘आय अ‍ॅम बाँड, जेम्स बाँड.’’ त्या माणसाने ती गोळी हातात झेलली आणि बाँडवर फेकून मारली. बाँड जागीच गतप्राण झाला, तेव्हा तो माणूस म्हणाला, ‘आय अ‍ॅम कांत, रजनीकांत. येन्ना रास्कला.’’



एकदा एका माणसाने जळती सिगारेट हवेत भिरकावली. ती एका ग्रहावर जाऊन पडली. तो ग्रह धडाडून पेटला.. त्यालाच आता आपण सूर्य म्हणतो.. सिगारेट फेकणा-या माणसाचं नाव सांगायलाच हवं का?



एकदा रजनीकांतने संतापून झाडू मारणा-या एका पो-याला लाथ मारली.. तो झाडूसह आकाशात फेकला गेला.. आज लोक त्याला हर्री पोट्टर म्हणून ओळखतात.



एकदा रजनीकांत कपातून चहा पीत होता. तो त्याला जरा जास्त झाला. त्याने हातातल्या सुरीने चहा अर्धा कापला.. तीच जगातली पहिली ‘कटिंग चाय’ होती.



हृतिक रोशनने रजनीकांतशी स्पर्धा करण्याचा प्रयत्न केला.. ‘गुजारिश’मध्ये बिचा-यावर संपूर्ण सिनेमाभर व्हीलचेअरमध्ये बसून राहण्याची पाळी आली.



एकदा रजनीकांतने अलका कुबलला एक तास हसवले!!! तेव्हापासून तिला मराठी पिक्चर भेटने बंद झाले - बिच्चारी !



रॉजर फेडरर म्हणाला, ‘‘मला टेनिसबद्दल काहीही विचार.. मला सगळं काही ठाऊक आहे?’’ रजनीकांतने विचारलं, ‘‘नेटमध्ये भोकं किती असतात?’’



ध्वनीपेक्षा जास्त स्पीड कोणाचा असतो?.. प्रकाशाचा.. तुम्ही ‘रजनीकांत’ असं उत्तर देणार होतात, हो ना? पण, रजनीकांतचा वेग कोणत्याही मापात मोजता येत नाही.
दिवाळीत रजनीकांत फटाक्याने उदबत्ती पेटवतो.



रजनीकांत कॉलेजात शिकत होता तेव्हा प्रोफेसरच लेक्चर बंक करायचे.



कांद्याच्या किंमती इतक्या भडकल्यात की आता रजनीकांतनेही जैन व्हायचं ठरवलंय.



एकदा रजनीकांत एका खलनायकाच्या कानात काहीतरी पुटपुटला आणि तो खलनायक जागीच गतप्राण झाला.. रजनीकांत त्याच्या कानात फक्त एवढंच पुटपुटला होता, ‘ढिशक्यांव!!!!’



सुपरमॅन आणि रजनीकांत यांनी एकदा एकमेकांशी पैज लावली होती.. जो पैज हरेल, त्याने उरलेल्या संपूर्ण आयुष्यात अंडरवेअर बाहेरच्या कपडय़ांच्या वर घालायची असं ठरलं होतं..



‘मिशन इम्पॉसिबल’ हा सिनेमा टॉम क्रूझच्या आधी रजनीकांतलाच ऑफर झाला होता.. रजनीकांतने तो नाकारला.. सिनेमाचं शीर्षक त्याला फारच अवमानकारक वाटलं म्हणे!



एका हाताने पन्नास मोटारी कोण थांबवू शकतो?.. ट्रॅफिक हवालदार.. सगळय़ा गोष्टी रजनीकांतच करू शकतो की काय?



रजनीकांतने एकदा आत्मचरित्र लिहिले.. त्यालाच आपण गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्स या नावाने ओळखतो.



मानवतेवर उपकार करा आणि रजनीकांतवरचे वेडेवाकडे विनोद एकमेकांना फॉरवर्ड करणे बंद करा.. नाहीतर.. नाहीतर तो एखाददिवशी संतापून इंटरनेटच डिलिट करून टाकेल!!



नव्या वर्षाची भेट
फेकिया कंपनीचा नवीन रजनी सिरीजचा ताकदवान आर-11 मोबाइल
एकावेळी 10 सिमकार्ड सामावून घेणारा
500 जीबी मेमरी
320 मेगापिक्सल कॅमेरा
शिवाय टीव्ही, फ्रिज, एसी आणि कार.. एकाच मोबाइलमध्ये



2012 सालापर्यंत जगभरातील लोक कम्प्यूटरमध्ये अतिशय ताकदवान हार्डडिस्क वापरू लागतील.. जिची क्षमता मेगा बाइट्स, किलोबाइट्स किंवा गिगाबाइट्समध्ये नव्हे, तर रजनीबाइट्समध्ये मोजली जाईल.



आदर्श सोसायटीच्या बद्दल तेव्हाचे मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी सोनिया गांधींना काय स्पष्टीकरण दिले?.. ‘‘ती इमारत सहाच मजल्यांची होती मॅडम. रजनीकांतने खेचून 31 मजल्यांची केली!!!’



चीन, पाकिस्तान, बांगलादेश हे सगळे भारताचे शत्रू उत्तरेलाच का आहेत?.. कारण, दक्षिणेला रजनीकांत आहे!!!



रजनीकांतचा जन्म 30 फेब्रुवारी रोजी झाला.. त्यानंतर फेब्रुवारी महिन्याने ती तारीख कोणालाही दिली नाही.



रजनीकांतने दात मजबूत व्हावेत म्हणून लहानपणी एक खास टूथ पावडर वापरली.. तिलाच आपण आज ‘अंबुजा सिमेंट’ म्हणून ओळखतो.



रजनीकांत जेव्हा ‘कौन बनेगा करोडपती’ या कार्यक्रमात आला होता, तेव्हा त्याला विचारण्याच्या योग्यतेचा प्रश्न विचारण्यासाठी कम्प्यूटरला हेल्पलाइनची मदत घ्यावी लागली होती.



गॅलिलिओने दिव्याखाली अभ्यास केला.
ग्रॅहॅम बेलने अभ्यासासाठी मेणबत्ती वापरली.
शेक्सपीयरने रस्त्यावरच्या दिव्यांखाली अभ्यास केला, हे सर्वानाच ठाऊक आहे.
रजनीकांत मात्र केवळ उदबत्तीच्या प्रकाशात अभ्यास करून शिकला, हे फारसं कोणाला माहिती नाही.


Monday, September 26, 2011

भारत कधी कधी माझा देश आहे.

भारत कधी कधी माझा देश आहे.
आम्ही सारे भारतीय अलग अलग आहोत.
माझं आयुष्य हा काही राष्ट्रीय एकात्मतेचा प्रबंध नाही
त्यामुळे अन्य जाती धर्माशी माझा काडीचाही संबंध नाही.
माझ्या जातीचा,माणूस माझ्या धर्माचा माणूस हाच माझा भाऊ आहे...
माझा देश माझा खाऊ आहे.
खाऊन खाऊन तो संपणार आहे प्रांता प्रांताची जुंपणार आहे.
जुंपल्या नंतर फाटतील एकमेकांना लुटतील पुन्हा नवे परकीय साम्राज्यवादी येतील.
पुन्हा नव्या स्वातंत्र्य संग्रामासाठी नवे टिळक नवे गांधी होतील.

त्यांचेही पुतळे उभे राहतील पुतळ्यावर कावळे बसतील...
खुर्चीवर बगळे बसतील.
पुन्हा आम्ही एक होऊ स्वातंत्र्याचे गाणे गाऊ, "हम सब एक है,
हिंदू-मुस्लीम भाई भाई, हिं
दू-सिख भाई भाई,
हिंदू-इसाई भाई भाई,
हिंदू-बौद्ध भाई भाई,
हिंदू-जैन भाई भाई
जमलेच तर... हिंदू-हिंदू सुद्धा भाई भाई".

तोपर्यंत मित्रानो मला माझ्याच स्वातंत्र्याची तहान आहे
या देशापेक्षा मीच महान आहे.
मी माझ्यासाठीच जगतो,
मी माझ्यासाठीच मरतो.
आरशात पाहून मी मलाच नमस्कार करतो.

तेव्हा-
माझा जयजयकार असो,
माझ्या धर्माचा जयजयकार असो,
माझ्या पंथाचा जयजयकार असो,
माझ्या प्रांताचा जयजयकार असो.
झालाच तर... कधी कधी...
माझ्या देशाचा सुद्धा जयजयकार असो.
-रामदास फुटाणें

Tuesday, September 13, 2011

सूर म्हणतो साथ दे

                                                          सूर म्हणतो साथ दे,

                                                                दिवा म्हणतो वात दे. 
                                                          उन्हामधल्या म्हातार्याला
                                                                फक्त तुझा हात दे!
                                                          आभाळ म्हणत सावली दे
                                                                जमीन म्हणते पाणी दे!
                                                          माळावरच्या म्हातार्याला
                                                                फक्त तुझी गाणी दे!
                                                          कावळा म्हणतो पंख दे,
                                                               चिमणी म्हणते खोपा दे,
                                                          माझ्यासारख्या आजोबाला
                                                               फक्त तुझा  पापा दे!
                                                                           -कुसुमाग्रज

Saturday, August 13, 2011

या नभाने या भुईला दान द्यावे


या नभाने या भुईला दान द्यावे

आणि या मातीतून चैतन्य गावे
कोणती पुण्ये अशी येती फळाला
जोंधळ्याला चांदणे लगडून जावे

या नभाने या भुईला दान द्यावे
आणि माझ्या पापणीला पूर यावे
पाहता सुगंध कांती सांडलेली
पाखरांशी खेळ मी मांडून गावे

गुंतलेले प्राण या रानात माझे
फाटकी ही झोपडी काळीज माझे
मी असा आनंदुन बेहोष होता
शब्दगंधे तू मला वाहून घ्यावे 

-
ना. धों. महानोर

Tuesday, August 2, 2011

प्रेम कर भिल्लासारखं


पुरे झाले सुर्य चंद्र, पुरे झाल्या तारा,
पुरे झाले नदीनाले, पुरे झाला वारा
मोरासारखा छाती काढून उभा राहा
जाळासारखा नजरेमध्ये नजर बांधून पहा,
सांग तिला तुझ्या मिठीत स्वर्ग आहे सारा
शेवाळलेले शब्द अन यमक छंद करतील काय?
डांबरी सडकेवरती श्रावण इंद्रधनू बांधील काय?
उन्हाळ्यातल्या ढगासारखा हवेत बसशील फिरत,
जास्तीत जास्त बारा महिने बाई बसेल झुरत
नंतर तुला लगीनचिठ्ठी आल्याशिवाय राहील काय?
म्हणून म्हणतो जागा हो जाण्यापुर्वी वेळ,
प्रेम नाही अक्षरांच्या भातुकलीचा खेळ
प्रेम म्हणजे वणवा होऊन जाळत जाणं,
प्रेम म्हणजे जंगल होऊन जळत रहाणं
प्रेम कर भिल्लासारखं बाणावरती खोचलेलं,
मातीमध्ये उगवून सुध्दा मेघापर्यंत पोचलेलं
शब्दांच्या या धुक्यामध्ये अडकू नकोस,
बुरुजावरती झेंड्यासारखा फडकू नकोस
उधळून दे तुफान सारं काळजामध्ये साचलेलं,
प्रेम कर भिल्लासारखं बाणावरती खोचलेल!

- कुसुमाग्रज

Saturday, July 30, 2011

आई


आई एक नाव असत
घरातल्या घरात गजबजलेलं गाव असत
सर्वात असते तेव्हा जाणवत नाही
आता नसली कुठच तरी नाही म्हणवत नाही

जत्रा पांगते पाल उठतात
पोरक्या जमिनीत उमाळे दाटतात
आई मनामनात तशीच ठेउन जाते काही
जिवाचे जिवालाच कळावे अस जाते देऊन काही

आई असतो एक धागा
वातीला उजेड दाखवणारी समईतील जागा
घर उजळते तेव्हा तीच नसत भान
विझून गेली अंधारात की सैरावैरा धावायलाही कमी पड़त रान

आई घरात नाही मग कुणाशी बोलतात गोठ्यात हंबरणाऱ्या गाई ?
आई खरच काय असते,
लंगड्याचा पाय असते, वासराची गाय असते
दुधावरची साय असते, लेकराची माय असते

आई असते जन्माची शिदोरी
सरतही नाही आणि उरतही नाही.


- फ. मु. शिंदे

Friday, July 29, 2011

गवाताच पातं


गवाताच पातं वार्‍यावर डोलतं
डोलतान म्हणतं खेळायला चला ||ध्रु||

झर्‍यातलं पाणी खळ खळा हसतं
हसताना म्हणतं खेळायला चला
निळं निळं पाखरू आंब्यावर गातं
गाताना म्हणतं नाचायला चला ||१||

झिम्मड पावसात गारांची बरसात
बरसात म्हणते वेचायला चला
छोटासा मोती लपाछपी खेळतो
धावताना म्हणतो शिवायाला चला ||२||

मनिच पिल्लू पायाशी लोळतं
लोळतान म्हणतं जेवायला चला
अहो,जेवायला चला
तुम्ही जेवायला चला ||३||


- कुसुमाग्रज

घननिळ(किनारा)


घननिळ सागराचा घननाद येतो कानी,
घुमती दिशा दिशांत लहरीमधील गाणी,

चौफेर सूर्य ज्वाला वारा अबोल शांत,
कोठे समुद्र पक्षी गगनी फिरे निवांत,

आकाश तेज भारे माडावरी स्थिरावे,
भटकी चुकार होडी लाडात संथ धावे,

वाळूत स्तब्द झाला रेखाकृती किनारा,
जवळी असून पाणी अतृप्त तो बिचारा,

जलधी बरोबरीचे आभासमान नाते,
त्याची न त्यास धरती संकेत फक्त खोटे,

सानिध्य सागराचे आकाश पांघराया,
परी साथ ना कोणाची अस्तीत्व सावराया

- विद्याधर सीताराम करंदीकर

ऋणाईत...........................................


स्वत:वरचा जगावरचा विश्वास जेव्हा उडून जातो..
माउलीची कूस बनून शब्दच मला जवळ घेतात ...
लाजिरवाणे असे जीणे अपमानाचे जगत जातो..
प्राण चुंबुन घुसमटलेले शब्दसखेच धीर देतात...

अंधारून येतात दिशा..चार भिंती एक छप्पर..
काळोखात बुडून जाते..झाडे खातात मुकाट मार..
चिक चिक माती रप रप पाय..ठणकणारी जखम जशी..
असे होते मन आणि शब्दच होतात सहप्रवासी..

प्रवासाच्या सुरुवातीला वळणवेड्या मार्गावरून मरण येते
कवेत घेउन माझ्या आधी शब्दच त्याचे स्वागत करतात
ऋणाईत मी शब्दांना सर्वस्वाने ओलीस जातो..
प्रारब्धाच्या प्रकाशधारात ऋणाईत गाणे गातो...

कवी - केशव तानाजी मेश्राम

माझ्या गोव्याच्या भूमीत.


माझ्या गोव्याच्या भूमीत
गड्या नारळ मधाचे,
कड्या-कपाऱ्यां मधुन
घट फ़ुटती दुधाचे||

माझ्या गोव्याच्या भूमीत
आंब्या-फ़णसाची रास,
फ़ुली फळान्चे पाझर
कळी फ़ुलांचे सुवास||

माझ्या गोव्याच्या भूमीत
वनश्रीची कारागिरी,
पाना-फ़ुलांची कुसर
पशु-पक्ष्यांच्या किनारी||

माझ्या गोव्याच्या भूमीत
उन्हाळ्यात खारा वारा,
पावसात दारापुढे
सोन्याचांदीच्या रे धारा||

माझ्या गोव्याच्या भूमीत
येते चांदणे माहेरा,
ओलावल्या लोचनांनी
भेटे आकाश सागरा||

माझ्या गोव्याच्या भूमीत
चाफ़ा पानाविण फ़ुले,
भोळा भाबडा शालीन
भाव शब्दाविण बोले||

माझ्या गोव्याच्या भूमीत
गडे साळीचा रे भात,
वाढी आईच्या मायेने
सोन-केवड्याचा हात||

माझ्या गोव्याच्या भूमीत
सागरात खेळे चांदी,
आतिथ्याची, अगत्याची
साऱ्या षडरसांची नांदी||

- बा. भ. बोरकर

Tuesday, July 26, 2011

कुठे शोधिसी रामेश्वर...................

कुठे शोधिसी रामेश्वर अन कुठे शोधिसी काशी,
हृदयातील भगवंत राहीला, हृदयातून उपाशी.


झाड फुलांनी आले बहरुन, तू न पाहीले डोळे उघडून, 
वर्षाकाठी पाऊस धारा, तुला न दिसला त्यात इशारा, 
काय तुला उपयोग आंधळ्या, दीप असून उशासी.


रुद्राक्षांच्या गळ्यात माळा, लाविलेस तू भस्म कपाळा, 
कधी न घेऊन नांगर हाती, पिकविलेस मातीतून मोती, 
हाय अभाग्या भगवे नेसून घर सन्यासून जाशी,


देव बोलतो बाळ मुखातून, देव डोलतो उंच पिकातून,
कधी होऊनी देव भिकारी, अन्नासाठी आर्त पुकारी,
अवती भवती असून दिसेना, शोधितोस आकाशी.

Saturday, April 16, 2011

"Stay Hungry Stay Foolish" - Steve Jobs.

apple कंप्युटर्स  या जगातील सवार्त क्रिएटीव समजल्या जाणार् या कंपनीचा सीइओ स्टीव जॉब्ज यांचे Stay
Hungry. Stay Foolish हे  वाक्य खुपच प्रसिद्ध  आहे  स्टीव यांनी १२ जुन २००५ साली स्टॅन फोर्ड
युनीवसीर्टी येथे केलेल्या एका भाषणामध्ये हे वाक्य उद्गारले होते. त्याच भाषणाचा स्वैर अनुवाद मी
वाचकांसाठी येथे देत  आहे . मी वाचलेल्या आणि ऐकलेल्या भाषणांपैकी सवोर्त्तम भाषण आहे .

                       जगातील सवोर्त्तम विद्यापीठांमध्ये ज्याची गणना केली जाते अशा विद्यापीठाच्या समारंभामध्ये भाषण करण्यासाठी बोलावले हा मी माझा सन्मान समजत्तो. खरे सांगायचे तर मी कोणत्याही कॉलेजमधुन पदवी प्राप्त केलेली नाही, त्यामुळे कदाचीत आजचे माझे भाषण हे  कॉलेज आणि  पदवी या  विषयांशी आलेला माझाआज पर्यंतचा सर्वात  जवळचा संबंध आहे . आज मी तुम्हाला तीन गोष्टी सांगणार आहे . होय माझ्या आयुष्यात घडलेल्या फक्त तीन गोष्टी. बाकी काहीही नाही.

पहीली गोष्ट -
मी रीड कॉलेजमध्ये प्रवेश घेतल्यानंतर फक्त ६ महीन्यातच कॉलेज सोडले. आणि  त्यानंतर सुमारे १८ महीने तेथेच कॉलेज ड्रॉपआउट म्हणुन रेंगाळलो पण त्यानंतर कॉलेज पुणर्पणे सोडुन दिले. मी कॉलेज का सोडले? याची कथा सुरु झाली माझ्या जन्माच्या आधीपासुन. माझी आई ही एक तरुण, लग्न न झालेली कॉलेज विद्यार्थिनी  होती. माझा जन्म व्हायच्या आधीच तीने मला दत्तक द्यायचे ठरवले होते. मात्र तीची एक ईच्छा होती की माझे भावी पालक हे किमान पदवीधर असावेत. त्यापर्माणे एक वकील आणि  त्याची उच्चशीक्षीत पत्नी मला दत्तक घेण्यासाठी राजी झाले. मात्र त्यांना एखादी मुलगी दत्तक घ्यायची होती. माझ्या जन्मांनंतर , मी मुलगा आहे हे  कळल्यावर त्यांनी मला दत्तक घेण्याचा विचार बदलला. मला दत्तक घेण्यासाठी राजी असलेल्या (वेटींग लिस्टवरील) दुसर् या जोडप्याने मात्र मला स्वीकारले. पण माझे भावी पालक पदवीधर नसल्याने माझ्या आईने कागदपत्रावर सही करण्यास नकार दीला. मला कॉलेजला पाठवायचे आश्वासन त्या जोडप्याने दील्यानंतरच माझ्या आईने मला दत्तक देण्यासाठी कागदपत्रावर सही केली. आणि  त्यानंतर १७ वषार्ंनी मी कॉलेजला गेलो देखिल.मी निवडलेले कॉलेज फार महागडे होते आणि  माझ्या मध्यमवगीर्य पालकांनी मेहनतीने जमवलेल्या पैशांचाबराचसा भाग माझ्या शिक्षणासाठी खर्च होत होता. कॉलेजमध्ये सहा महीने घालवल्यानंतर की मला कॉलेजमध्ये अजीबात रस वाटत नव्हता. मला काय करायचे आहे, कोणते क्षेत्र निवडायचे आहे याबाबतीत काहीच निर्णय होत नव्हता. हे कॉलेज मला ती उत्तरे शोधुन देइल असेही वाटत नव्हते. शेवटी मी कॉलेज सोडण्याचा निर्णय घेतला. तेव्हा हा निर्णय खुपच धाडसी होता आिण मला त्याबद्दल भीतीदेखील वाटली होती. पण आता मागे वळुन पाहताना असे वाटते की मी आजवर घेतलेल्या निर्णयापैकी तो सर्वोत्तम  निर्णय होता. आता कॉलेज नसल्यामुळे मी इतर सर्व क्लासेसही बंद करुन टाकले होते.आणि  मला आवड असलेल्या विषयांशी संबंधीत क्लासेसच्या शोधात होतो. पण हे तीतकेसे सोपे नव्हते. मला हॉस्टेलची सुवीधा नसल्याने मी एका मित्राच्या घरी जमीनीवर झोपत असे. जुन्या कोकच्या बॉटल्स जमा करुन आणि  विकून  मिळनार्या  या ५सेंट्स मधुन माझा जेवनाचा प्रश्न  सोडवत असे. आणि दर रवीवारी हरे कृ ष्णा मंदीरामध्ये मिळणार्या चांगल्या जेवणासाठी ७ मैल चालत जात असे. रीड कॉलेजमध्ये त्यावेळेस सर्वात चांगले कॅलीग्राफीचे  (Calligraphy - सुलेखन)क्लासेस चालवले जात असत. आता इतर रेग्युलर विषयांची चिंता नसल्याने मी कॅलीग्राफीच्या क्लासेसमध्ये जाण्याचे ठरवले. तेथे मी सेरीफ आिण सॅनसेरीफ आदी लिपी (Fonts) शिकलो.अक्षराची जाडी, वळणे, दोन अक्षरांमध्ये ठेवावयाचे अंतर इत्यादी गोष्टी मी तेथे तपशीलात शिकलो. तसे सर्व  व्यावहारीक गोष्टींसाठी माझ्या या कलेचा मला काहीच फायदा होणार नव्हता. पण त्यानंतर दहा वषार्ंनी जेव्हा आम्ही पहीला मॅकींतॉश संगणक डीझाईन केला तेव्हा मला याचा भरपुर फायदा झाला. त्यावेळी घेतलेल्या कॅलीग्राफीच्या ज्ञानाचा वापर करुन मी अनेक डीझाइनर फाँट्सचा वापर संगणकामध्ये करण्याची प्रथा सुरु केली. पुढे मिक्रोसॉफ्टने आमची कॉपी करुन निवन निवन फाँट्स उपलब्ध करुन दीले. जर मी तेव्हा कॅलीग्राफी शिकलो नसतो तर कदाचीत आज सवर्च संगणक इतके सुन्दर आणि  सोपे झाले नसते. एकुणच मागे वळुन पाहताना आपल्याबरोबर जे जे काही घडते ते सारेच व्यर्थ नसते आणि सर्व गोष्टी तसेच अनुभव आपल्याला जागोजागी उपयोगी पडत असतात. गरज असते ती फक्त अशा आयुष्यातील अनेक घटनांना बिंदु मानुन त्यांना एकत्र जोडण्याची. तेव्हाच आपल्या आयुष्याची रेषा पूर्ण होते. अथार्त आपल्याला ते बिंदु दिसत नाहीत, ते कळतात फक्त भूतकाळात डोकावुन पाहताना . पण एक विश्वास दॄढ असला पाहीजे की अनेक घटना आपल्या आयुष्यात बिंदु बनुन येत आहेत. आणि हे बिंदु जोडुनच आयुष्य बनणार आहे. हा माझा विश्वासच मला सदैव उपयोगी पडला आहे.

दुसरी गोष्ट -
मी स्वतःला खुप भाग्यशाली समजतो कारण मला आयुष्यात पुढे काय करायचे आहे ते मला खुप लवकर समजले. वॉझ आिण मी मिळून माझ्या पालकांच्या गॅरेजमध्ये apple कंप्युटर्स चालु केली तेव्हा मी अवघा वीस वषार्चा होतो. आम्ही खुप मेहनत करुन फक्त दहा वषार्त apple ला  इतकी मोठी केली की apple मध्ये ४००० कमर्चारी आले आणि apple ची वाषीर्क उलाढाल २ बिलीयन डॉलर्स इतकी झाली होती. तेव्हाच आम्ही आमचा सवोर्त्कृष्ट आविष्कार मॅकींतॉष संगणक बाजारात आणला होता. आिण त्यानंतर एका वर्षातच मी ३० वषार्चा झालो होतो. आणि तेव्हाच मला aaple  मधुन काढुन टाकण्यात आले. तुम्ही म्हणाल की ज्याने कंपनी सुरु केली त्यालाच कसे काढुन टाकता येइल. पण असे झाले होते. apple च्या वाढत्या पसार्याला सांभाळण्यासाठी आम्ही एका व्यक्तीची नेमणुक केली होती. आमच्या मते ती व्यक्ती या कामासाठी सर्वोतोपरी पात्र होती. त्यानंतर पहीले वर्ष तसे चांगले गेले पण नंतर आमच्या मध्ये काही मतभेद आणि  दुरावे निमार्ण झाले. आमच्या सर्व  डायरेक्टसर्नी त्या व्यक्तीची बाजु घेतली आणि  मला बाहरे काढुन टाकले. मी सर्व समक्ष बाहरे गेलो होतो. माझी हार अगदी खुलेपणाने सर्वाच्या चर्चेची  विषय बनली होती. ज्या कंपनीसाठी मी गेली दहा वर्ष झटलो होतो, जीच्यासाठी मी माझ्या तारुण्यातील मह्त्वाची वर्षे अक्षरक्षः वाहीली होती आज मी त्याच कंपनीतुन बाहेर हाकललो गेलो होतो. हा माझ्यासाठी खुप मोठा धक्का होता, मला सेलीकॉन व्हॅलीमधुन पळुन जावेसे वाटत होते. पण एक गोष्ट हळुहळु माझ्या लक्षात येउ लागली होती की मला माझे काम अजुनही तितकेच आवडत होते. Apple  मध्ये माझ्यासोबत्त जे काही झाले त्यामुळे माझ्या कामावरील प्रेमात तसुभरही फरक पडला नव्हता. म्हणुन मी पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करण्याचा निणर्य घेतला. आता मागे वळुन पाहताना वाटते की Apple मधुन बाहरे हाकलला जाणे ही माझ्यासोबत घडलेली सर्वात चांगली गोष्ट होती. यशाचं ओझं मनावर बाळगण्यापेक्षा आता मला नविन सुरुवात करण्याची संधी मिळाल्यामुळे हलकं हलकं वाटत होते. मला माझ्या आयुष्यातील सर्वात  सृजनशील (Creative) काळ त्यामुळेच उपभोगता आला. पुढील पाच वर्षात मी नेक्स्ट(NeXT) आिण पिक्सार (Pixar) अशा दोन कंपन्या चालु केल्या आणि त्याचदरम्यान लॉरेन नावाच्या एका तरुणीच्या प्रेमात पडलो आणि तीच्याशी लग्न केले. पिक्सारनेच पुढे "टॉय स्टोरी" नावाची संगणकावर बनलेली जगातील पहीली अनीमेशन फील्म बनवीली, आणि  आज पिक्सारची गणना जगातील सवोर्त्कृष्ट अनिमेशन स्टुडीओ मध्ये केली जाते. पुढे असे काही घडलं ज्याची मी कल्पनाच केली नव्हती. apple ने माझी नेक्स्ट ही कंपनी विकत घेतली आणि त्याद्वारे मी पुन्हा Apple मध्ये दाखल झालो. मला सांगण्यास अभिमान वाटतो की नेक्स्टमध्ये मी जे तंत्रज्ञान विकसीत केले होते, तेच तंत्रज्ञान आज Appleच्या पुनरुज्जीवनास कारणीभुत ठरले आहे. मला खात्री  आहे   की जर मला apple मधुन काढण्यात आले नसते तर आयुष्यात इतक्या चांगल्या गोष्टी कधीच घडल्या नसत्या.ते एक कडवट औषध होते यात काही वाद नाही पण पेशंटला त्याची गरज होती हे देखील तीतकेच खरे. कधीकधी आयुष्यात बरीच अनाकलनीय वळणे येतात, अशा वेळेस तुमचा विश्वास ढळु देउ नका. मला हे सर्व करण्याचे सामर्थ्य देणारी एकच गोष्ट होती ती म्हणजे माझे माझ्या कामावरील प्रेम. तुमच्या आयुष्यातील बराचसा भाग तुम्ही करत असलेल्या कामाने व्यापलेला असतो. आपल्याला आवडणारे काम करण्यातच खरे समाधान लपलेले असते. जर तुम्हाला तुमचे आवडते काम मिळाले नसेल किंवा काय करायला तुम्हाला सगळ्यात जास्त आवडते हे कळले नसेल तर त्याचा शोध घ्या आणि  जोपर्यंत  या पर्श्नाचे उत्तर मिळत नाही तोपयर्ंत शोधत रहा. एक दिवस तुम्हाला ते नक्की मिळेल.

तीसरी गोष्ट -
मी सतरा वर्षाचा असताना माझ्या वाचण्यात एक वाक्य आले होते," जर तुम्ही आयुष्यातील प्रत्येक दीवस हा शेवटचा दीवस आहे असे मानलेत, तर एक दीवस तुम्ही नक्की बरोबर (Correct) असाल". त्या वाक्याचा माझ्या मनावर खुप खोलवर प्रभाव पडलाय. आणि तेव्हापासुन गेले ३३ वषेर् मी दररोज आरशासमोर उभा राहुन स्वतःला एक प्रश्न  विचारतो," जर आज माझ्या आयुष्यातील शेवटचा दीवस असता तर मी तेच केले असते का जे मी आज करायला जाणार आहे?". जेव्हा लागोपाठ बरेच दीवस उत्तर "नाही" असे येते तेव्हा काहीतरी बदल केला पाहीजे हे मला कळु लागते. लवकरच मी मरणार आहे याची सतत जाणीव असणे यासारखा दुसरा उपाय नाही असे मला वाटते. आयुष्यातील सवार्त मोठे निणर्य घेताना मला या जाणीवेचा नेहमीच फायदा होतो. कारण इतर सर्व आशाअपेक्षा, मानस्न्मान, गर्व, काम करण्याची लाज, हरण्याची भीती आदी सर्व भावना या मरणापुढे दुय्यम ठरतात.आज ना उद्या तुम्ही मरणार आहात याची जाणीव असली की मग कसलीच भीती उरत नाही. काहीच हरवण्याची  किंवा  स्वतः हरण्याची भीती देखील राहत नाही. तुमच्या मनाचा आवाज ऐकण्यापासुन् कोणीच तुम्हाला रोखु शकत नाही.एका वर्षापूर्वी मला कॅ न्सर असल्याचे निदान करण्यात आले होते. सकाळी ७.३० वाजता माझे स्कॅन करण्यात आले आणि  संध्याकाळी रीपोटर् आल्यावर मला कॅन्सर झाल्याचे  निष्पन्न झाले. डॉक्टसर्च्या मते हा कॅन्सर बरा होण्यापलीकडचा होता, त्यांनी मला सरळ शब्दांत सांगीतले की मी जास्तीत जास्त ३ ते ६ महीने जगु शकतो.माझ्या डॉक्टरने मला घरी जाउन शक्य तीतक्या गोष्टी आटोपण्याचा सल्ला दीला. याचाच अर्थ मला मी गेल्यानंतर माझ्या कु टुंबाला कमीत कमी त्रास व्हावा म्हणुन सर्व गोष्टी करायच्या होत्या, पुढच्या १०-१२ वर्षात माझ्या मुलांना जे सांगायचे होते ते सांगण्यासाठी आता माझ्याकडे काही महीन्यांचा अवधी होता.मला शक्य तीतक्या नातेवाईकांचा आणि   मित्रांचा निरोप घ्यायचा होता. त्याच दीवशी संध्याकाळी बायॉप्सी करण्यात आली. माझ्या घशाद्वारे एक एक एंडोस्कोप आत ढकलण्यात आला. माझ्या पोटाद्वारे आतड्यांमधुन पुढे जात स्वादुपिंडामधुन एक सुइने ट्युमरमधील पेशी काढण्यात आल्या. या सर्व प्रक्रिये आधी मला बेशुद्ध करण्यात आले होते. मात्र नंतर माझ्या बायकोने सांगीतले की त्या पेशी मायक्रोस्कोपखाली पाहुन डॉक्टर्स अक्षरक्षः रडु लागले कारण मला झालेला स्वादुपींडाचा कर्करोग हा ऑपरेशनने बरा होणार् या अतीशय दुर्मीळ प्रकारचा कॅन्सर होता. मी लगेचच ऑपरेशन करुन घेतले आणि  आज मी ठणठणीत बरा आहे. माझा मृत्युशी झालेला तो सर्वात जवळचा सामना होता. म्हणूनच मी मगाशी खात्रीपुवर्क सांगु शकलो की मरणासारखा दुसरा उपाय नाही. मरणाशी संबंधीत एक तत्त्वज्ञान मात्र  मला जरुर कळले. कोणालाही मरायला आवडत नाही. ज्याला स्वर्गात जायची इच्छा आहे असा माणुसदेखील त्यासाठी आधी मरायला तयार नसतो. आणि  तरीदेखीलआपल्या सर्वानाच एक ना एक दीवस मरण पत्करायचे असते. कोणाचीच यातुन सुटका नाही. खरेतर मृत्यु हा विधात्याने लावलेला सर्वश्रेष्ठ शोध आहे. त्यामुळेच जुने संपुन नव्याकरीता मार्ग मोकळा होतो. आज तुम्ही नविन आहात पण लवकरच तुम्ही देखील जुने व्हाल. कीतीही नाट्यमय वाटले तरी मी बोलतोय ते सत्य आहे  आपल्याकडे  खरचं खुप मयार्दीत वेळ आहे हा वेळ कुणा दुसर्यांच आयुष्य जगण्यात घालवु नका. इतरांच्या मतांच्या गोंधळात स्वतःच्या मनाचा आवाज दबु दउे नका. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे स्वतःला जे आवडते, जे करायचं आहे तेच करा. बाकी सगळं दुय्यम. माझ्या तरुणपणी स्टीवर्ट बर्ँड नावाच्या युवकाने संपुर्ण जगाचा संदर्भ ग्रन्थ बनवला होता. तेव्हा संगणक नसल्यामुळे तो टाइपरायटरवर लिहून आणि कॅमेर्याने टीपलेल्या चित्रांच्या  सहाय्याने बनवलेला होता. तो ग्रन्थ म्हणजे जणु छापील गुगल होते. गुगल यायच्या ३५ वषेर् आधी हा संदर्भ ग्रन्थ प्रकाशीत झाला होता. त्या ग्रंथाच्या शेवटच्या पानावर स्टीवटर् बर्ँडने जाताजाता एक वाक्य लिहीले होते, "Stay Hungry, Stay
Foolish" . मी नेहमीच या वाक्याचा अवलंब केला. आणि आता तुम्ही पदवी घेउन एका नवीन आयुष्याला
सुरुवात करत आहात म्हणून मी तुम्हालाही याच शुभेच्छा देतो, "Stay Hungry, Stay Foolish".