Amazon

Friday, April 13, 2012

माणूसपण गारठलंय

पूर्वी कसा पाऊसकाळ
चार महिने असायचा,
हिरवंगार रान पाहून
माणूस खुशीत हसायचा.

प्रत्येकाची कणगी भरून
धान्य मोप असायचं,
दुधदुभतं, तूप, लोणी
याला माप नसायचं.

पासाभरून धान्य तर
चिमणीच दारात टिपायची,
पै-पाहुण्यांसाठी माय
दिवसरात्र खपायची.

सणवार जत्रांमधून
किती जल्लोष असायचा,
भजन कीर्तन करीत गांव
आख्खी रात्र बसायचा.

एवढ्या तेवढ्या पावसावाचून
सारं चित्र पालटलंय,
गांवपण हरवल्यानं
माणूसपण गारठलंय.


- शशिकांत शिंदे

No comments:

Post a Comment