Amazon

Showing posts with label Inspiring. Show all posts
Showing posts with label Inspiring. Show all posts

Sunday, August 5, 2018

नाटक - अनन्या

नाटक - अनन्या

नावाप्रमाणेच अनन्यसाधारण अस नाटक आहे.
नाटकाबद्दल काय बोलणार, अशी नाटकं पहायचे योगायोग फार दुर्मिळ, दुर्मिळ या कारणाने की अशी नाटकं येतात त्यावेळी त्या बद्दल जास्त माहिती नसते ( आपलीच चुक , कारण चांगल्या गोष्टी आपल्याला खुप उशीरा कळतात). आता पर्यन्त या नाटकाचे 100 च्या वर प्रयोग झाले, नेहमीप्रमाणे जाहिरातही दिसायची (weekend ला नाट्यग्रह visit करायची जुनी सवय असल्याने) हे नाटक एकदा पहावे असा विचार काही येत नव्हता, एखाद्या वेळी मित्राचा ग्रुप येईल भेट होईल, त्यावेळी पाहु वगेरे.. वगेरे. असा विचार झाला असावा.
अशीच चर्चा चालू होती नाटकाबद्दल त्यावेळी समजलं आनंदवन मधे याचा शो झाला होता, म्हणजे नाटक उत्तम असणार म्हणून त्यावेळीच ठरवलं की हे नाटक पुण्यात आल्यावर पहायच.
पुन्हा weekend ला मोकळा वेळ असेल का याचही गणित चालूच असायच. असच योग आला आणि सर्व फ्रेंड्स मिळुन नाटक पहायच ठरलं तरीही माझ फिक्स होत नव्हतं आणि may be I was lucky, नाटक पाहायला वेळ मिळाला.
नाट्काच्या तांत्रिक बाबी, अभिनय, नेपथ्य , संगीत, लाइट्स  याविषयी नेहमीप्रमाणे मी बोलणार नाही त्या बेसिक गोष्टी आहेत, नाटकच अप्रतिम असल्याने या गोष्टींवर शंका उपस्थीत करणे शक्यच नाही. एखाद्या प्रेक्षकाला बाहेर पडल्यावर जो आनंद मिळतो त्याविषयीच फक्त बोलतो आहे. तुम्हाला आठवते भूतकाळात कधी इतका आनंद झाला का की ज्यामुळे आनंदाश्रु आले असतील, आणि अश्याच आनंदाचे साक्षीदार पुन्हा व्हायचे असेल तर नक्कीच हे नाटक पहा. मुख्य भूमिका ज्यानी केली त्या 'ऋतुजा बागवे', त्यांच्या बद्दल मला जास्त माहिती नव्हती, फक्त मराठी मालिकांमधे आहे एवढीच माहिती. पण नाटक पाहिल्यावर यांच्याबद्दल आदर वाढला आहे, कारण अतिशय चैलेंजिंग भूमिका त्यानी केलेली आहे, अभिनयाबरोबर वेगळी मेहनत आणि अभ्यासही का गरजेचा आहे ते समजते. असे गुणी कालवंत मराठी मधे आहेत याचा अभिमान वाटतो. नाटकाबद्दल लिहिण्याच कारणं ख़ूप आहेत, नाटक पाहिल्या बरोबर वाटलं याबद्दल लिहावच लागेल, मिळालेल्या आनंदाला शब्द रूप मिळालेच पाहिजे. जसे नाटका मधे एका घटनेमुळे अनन्याचे ( मुख्य भूमिका) आयुष्य बदलले त्या प्रमाणेच पाहण्याऱ्या एखाद्या प्रेक्षकाचेही आयुष्य बदलू शकते. माझ्यासाठी एक आठवण झाले आहे हे नाटक. काही काही क्षणाला अरे 'किती भारी' असेच शब्द बाहेर पडतात heart melting moment काय असते याचा अनुभव येतो.
आयुष्याचे रहाटगाडगे चालूच असते पण नाटक पाहिल्यावर एक वेगळीच ऊर्जा मिळते. म्हणजे तुम्ही सोमवारी ऑफिसला जाताना एक वेगळीच ऊर्जा घेऊन,  प्रसन्न आणि आनंदी चेहरा घेऊन जाल. नाटकातले प्रत्येक पात्र हे काही महापुरुष वगेरे नाहीत, तेही आपल्या सारखेच आहेत त्यामुळे ते आपलेसे वाटतात, स्वभाव वैशिष्ट्य पाहुन लक्षात येईलच. मुख्य भूमिकाच फक्त नाही तर बाकी पात्रही तितकिच महत्वाची आणि त्यांचे चांगले काम झाले आहे. ते सहायक कलाकार जरी समोर ठेवून नाटक पाहिले तरी तेही खुप काही सांगून जातात.

नाटक सुरु होण्या अगोदर एक आश्चर्यकारक गोष्ट घडली, तांत्रिक कारणाने नाटकाचा प्रयोग सुरु होण्यासाठी 20 मिनिट उशीर झाला होता. आणि ते लक्षात आणून देण्यासाठी प्रेक्षकांनी टाळ्या वाजवायला सुरवात केली. 'आता नाटक सुरु करा अस रागवत न सांगता एक पुणेकर प्रेक्षकांनी एक विनम्र बाजू दाखवून दिली. साधी गोष्ट आहे पण चांगली वाटली म्हणून इथे मांडली. नाटक संपल्यावर प्रमोद पवार धन्यवाद देण्यासाठी बोलत होते, त्यावेळी त्यानी उशीरा नाटक सुरु झाल्याने संपूर्ण टीम कडुन दिलगिरी व्यक्त केली आणि म्हटले नाटकाच्या शेवटी ज्या टाळ्या मिळाल्या त्या खऱ्या टाळ्या आहेत'. प्रेक्षक आणि कलावंत दोन्ही प्रगल्भ असले की असे योगायोग येतात याचा अनुभव आला.

माझ्या सारख्या एखाद्या नाटकवेड्या रसिकाला ह्या नाटकाची माहिती व्हावी म्हणून हा आपला साधा प्रयत्न.
 - प्रमोद डमरे.

Thursday, January 7, 2016

Romantic thoughts from Rumi

1. "Your task is not to seek for love, but merely to seek and find all the barriers within yourself that you have built against it."

2. "Out beyond ideas of wrong-doing and right-doing, there is a field. I'll meet you there. When the soul lies down in that grass, the world is too full to talk about."

3. "The wound is the place where the Light enters you."

4. "Stop acting so small. You are the universe in ecstatic motion."

5. "What you seek, is seeking you."

6. "The minute I heard my first love story,I started looking for you, not knowing, how blind that was.Lovers don't finally meet somewhere.They're in each other all along."

7. "If you are irritated by every rub, how will your mirror be polished?"

8. "Don’t grieve. Anything you lose, comes around in another form."

9. "Dance, when you're broken open. Dance, if you've torn the bandage off. Dance in the middle of the fighting. Dance in your blood. Dance when you're perfectly free."

10. "You were born with wings, why crawl through life?"

11. "When you do things from your soul, you feel a river moving in you, a joy."

12. "Knock, And He'll open the door.
 Vanish, and he'll make you shine like the sun.
 Fall, and he'll raise you to the heavens.
 Become nothing,
 And He'll turn you into everything."

13. "Sell your cleverness and buy bewilderment."

14."Silence is the language of God,
 all else is poor translation."

-- Rumi 

Friday, November 6, 2015

सागराने

सागराने नाविका मनी संकट मोठे पेरले,
वादळाने होडीस एका दशदिशांनी घेरले
शीड तुटले, खीळ तुटले, कथा काय या वल्ह्याची,
नाविकास ही फिकीर नव्हती, पुढे राहिल्या पल्ल्याची...

नशीब नव्हते पाठीशी, नव्हता अनुभव गाठीशी
उभा ठाकला एकटाच, युद्ध होते वादळाच्या वय वर्षे साठीशी
स्वबळी विश्वास मोठा, त्यास तोड कर्तुत्वही
रौद्र वादळ शांत झाहले, पागळले शत्रुत्वही.

एकवटला धीर हा, कोठूनी येतो त्या क्षणी,
शत बाहूंचे बळ येते, जव मातृत्व तरळते मनी.


              - किल्ला (मराठी चित्रपट)

Tuesday, October 13, 2015

Beautiful Quotes From Rumi That Will Shift Your Perception About Life


“If you are irritated by every rub, how will your mirror be polished?” 

“You were born with wings, why prefer to crawl through life?” 

“The wound is the place where the Light enters you.” 

“Dance, when you’re broken open. Dance, if you’ve torn the bandage off. Dance in the middle of the fighting. Dance in your blood. Dance when you’re perfectly free.”

“Knock, And He’ll open the door
Vanish, And He’ll make you shine like the sun
fall, And He’ll raise you to the heavens
Become nothing, And He’ll turn you into everything.”
“When you do things from your soul, you feel a river moving in you, a joy.” 
 
“My soul is from elsewhere, I’m sure of that, and I intend to end up there.”

“Let yourself be drawn by the stronger pull of that which you truly love.” 

“Be empty of worrying.
Think of who created thought!
Why do you stay in prison
When the door is so wide open?” 

“This being human is a guest house. Every morning is a new arrival. A joy, a depression, a meanness, some momentary awareness comes as an unexpected visitor…
Welcome and entertain them all. Treat each guest honorably. The dark thought, the shame, the malice, meet them at the door laughing, and invite them in. Be grateful for whoever comes, because each has been sent as a guide from beyond.” 

“But listen to me. For one moment quit being sad. Hear blessings dropping their blossoms around you.” 

“Raise your words, not voice. It is rain that grows flowers, not thunder.” 
 
“Yesterday I was clever, so I wanted to change the world. Today I am wise, so I am changing myself.”

“Keep walking, though there’s no place to get to.
Don’t try to see through the distances.
That’s not for human beings. Move within,
But don’t move the way fear makes you move.” \

“The morning wind spreads its fresh smell. We must get up and take that in, that wind that lets us live. Breathe before it’s gone.” 

“Work on your strong qualities
and become resplendent like the ruby.
Practice self-denial and accept difficulty.
Always see infinite life in letting the self die.
Your stoniness will decrease; your ruby nature will grow.
The signs of self-existence will leave your body,
and ecstasy will take you over.” 

“Peaceful is the one who’s not concerned with having more or less.
Unbound by name and fame, he is free from sorrow from the world and mostly from himself.” 


“On a day when the wind is perfect, the sail just needs to open and the world is full of beauty.
Today is such a day.”


 

Friday, September 18, 2015

श्रम ही है श्रीराम हमारा - बाबा आमटे



बाबा आमटेंना आपण ओळखतो ते त्यांनी कुष्ठरुग्णासाठी उभारलेल्या आनंदवनासाठी;पण त्यांचं काम तेवढ्यापुरतं मर्यादित नव्हतं. बाबांचा ‘भारत जोडो यात्रा’ आणि ‘नर्मदा बचाव आंदोलन’ याच्यामधील सहभाग गांधींच्या रचनात्मक संघर्षाचं द्योतक होता. बाबांच्या एकूण विचारात ‘श्रम’ या संकल्पनेला विशेष महत्व दिलेलं आहे. त्यांच्या काही वाक्यांमधून, घोषणांमधून हेच प्रतीत होत, जसं की-
‘श्रम ही है श्रीराम हमारा’
‘ हाथ लगे निर्माण में, नही मांगने, नही मारने’
“कष्ट करुन घामेजलेलं शरीर हेच परमेश्वराचं रुप आहे. खरोखरची क्रांती कधीच विनाशकारी नसते.ख-या क्रांतीतून मोठं कार्य उभं रहातं. अशी क्रांती रक्तलांछित नसते तर कष्टाच्या घामाने थबथबलेली असते.”
आनंदवन थोडं स्थिरस्थावर झाल्यावर बाबांच लक्ष तरुणाईकडे गेलं. तरुणाई घडवणा-या शिक्षणव्यवस्थेतील त्रुटी त्यांनी जाणल्या आणि श्रमाचा तिरस्कार करणा-या तरुणाईवर श्रमाचा संस्कार व्हावा म्हणून श्रमिक विद्यापीठाची कल्पना त्यांना सुचली. त्यासाठी त्यांनी शासनाला जागेची मागणी केली. आनंदवनापासून जवळच मूल तालुक्यात १८०० एकर जमीन देण्यात आली;पण तिथं लोक वस्ती करुन रहात होते. बाबांनी त्या जमीनीचा त्याग केला नि महारोगी समितीला त्या ठिकाणी १२५० एकर जमीन मिळाली तिथे तिथल्या सोमनाथ ( महादेव) मंदिरामुळं या प्रकल्पाला सोमनाथ असं नाव पडलं. बाबांनी सोमनाथ हा ‘स्वयंपूर्ण शेतकी’ प्रकल्प म्हणून विकसित केला. सोमनाथ तर आता गांधींच्या स्वप्नातलं खेडं बनलं आहे. सोमनाथमधले बरे झालेले कुष्ठरोगी त्यांची स्वतःची संसाधने, रक्त, घाम माती, कष्ट वापरुन एकत्र राहतात. सोमनाथमध्ये कुष्ठरोग्यांनीच धान्याचे कोठार उभारलं आहे नि सोमनाथमध्ये मत्स्यव्यवसाय, दुग्धव्यवसाय..आदी शेतीपूरक व्यवसायांचंही केंद्र आहे.
बाबा श्रमिक विद्यापीठ उभा करु शकले नाहीत ;पण सोमनाथची स्थापना झाल्यापासून इस.१९६७ पासून श्रमसंस्कार छावणी शिबीर १५ मे ते २२ मे या काळात आयोजित केलं जातं. हा देशभरातून आलेल्या तरुणांचा वार्षिक श्रमोत्सव असतो. इथं वेगवेगळी कामं केल्यामुळं तरुणांमध्ये श्रमाचं मूल्य वाढीस लागतं.हे शिबीर सकारात्मक श्रमसंस्कृती, धर्मनिरपेक्ष मूल्य, राष्ट्रीय एकात्मता, पर्यावरण संरक्षण, वैज्ञानिक दृष्टिकोन रुजावा, यासाठी प्रयत्नशील असते.
शिबीरात सहभागी असलेली मुलं विविध विषयातील तज्ञ व्यक्तींसोबत त्या विषयावर चर्चा करत, प्रसंगी वादविवाद करतात. ही मुलं निरनिराळ्या समाजसुधारकांबरोबर मोठमोठ्या द्रष्ट्या व्यक्तींबरोबर वेळ व्यतीत करतात. शिबीरातील दैनंदिन कार्यक्रम असा असतो- सकाळी श्रमदान, दुपारी चर्चा व वादविवाद आणि सायंकाळी सांस्कृतिक कार्यक्रम. बाबा असे म्हणत- शिबीरात सहभागी झालेल्या १५०० युवक-युवतींपैकी एकाने जरी आपला वेळ, बुध्दी व शक्ती विकासाच्या कामी खर्च केली तरी आपल्या शिबीराला प्रचंड यश मिळेल, असं मी म्हणेन.”
आणि ते खरंच होत अशा कितीतरी यशाच्या गाथा सांगता येतील. महाराष्ट्रात नामवंत म्हणून गाजलेली अनिल अवचट, नागेश हडकर,कुमार शिराळकर, कुमार सप्तर्षी, दीनानाथ मनोहर, मुरलीधर शहा,अतुल शर्मा, सोमनाथ रोडे, अशोक बेलखोडे, माधव बावगे, गिरीश कुलकर्णी ही सगळी मंडळी सोमनाथच्या मातीतून घडलेली आहेत. २००८ साली मी पहिल्यांदा या शिबीराला गेलो होतो. त्यावर्षी सोमनाथला बिबट्यांचा त्रास सुरु होता म्हणून शिबीर आनंदवनात झालं ते पहिलंच शिबीर होतं. मी नववीत असताना ‘समिधा’ हे साधनाताई आमटे यांचं आत्मचरित्र वाचलं. ती माझी आनंदवनाशी आणि बाबा आमटेंशी पहिली ओळख. ‘समिधा’ वाचल्यानंतर मी खुओ भारावून गेलो होतो, वेडा झालो होतो.आनंदवन, सोमनाथ, लोकबिरादरी प्रकल्प, हेमलकसा हे सर्व पाहण्याची बाबांना भेटण्याची तीव्र इच्छा मनात जागृत झाली होती. समिधामध्येच मी शिबीराविषयी वाचलं होतं आणि तेव्हापासून शिबीरात जायचं ठरवलं होतं. बाबांसोबत भामरागड साहस सहलीत, दुस-या भारत जोडो यात्रेत आणि पंजाब शांतीयात्रेत सहभागी असलेले माधव बावगे हे आमच्या कुटुंबाचे मित्र व शेजारी आहेत आणि स्वतः सोमनाथ शिबीराचे गेले काही वर्ष संयोजक होते. त्यांच्याच माध्यमातून मी जायचं ठरवलं आणि तो योग दहावीनंतरच्या सुट्ट्यांमध्ये आला;पण तत्पूर्वीच फेब्रुवारीमध्ये बाबांचे निधन झाले होते. त्यांना प्रत्यक्ष पाहता आलं नाही, याचं दुःख आजही आहे.
विदर्भातला उन्हाळा तोपर्यंत फक्त पेपरमध्येच वाचला होता. प्रत्यक्ष तिथे गेल्यानंतर ४० ते ४५ डिग्री कधीकधी ४८ डिग्री तापमान आम्ही अनुभवलं. अशा कडाक्याच्या उन्हाळ्यात तिथं काम करण्याचं थ्रीलही होतं. पहाटे ४ वाजता बाबांच्या गीतांनी शिबीर परिसराला जाग येते. पाच वाजेपर्यंत आवरुन चहा घेऊन सगळे ध्वजाजवळ येतात. ध्वजवंदन झालं की ‘नौजवान आओ रे’, ‘जोडो भारत’ ही गीतं गायली जातात. ग्रुप पाडून ग्रुपनिहाय कामं वाटून दिली जातात.
शेतातली उन्हाळ्यातली वेगवेगळी कामं, तलावातला गाळ काढणे, आनंदवन पध्दतीचे बंधारे बांधणे, खोदकाम, स्वच्छता अशा प्रकारची कामं सांगितली जातात तर दोन ग्रुप जेवणाच्या व्यवस्थेचं आणि निवासाच्या ठिकाणच्या स्वच्छतेचं काम पाहतात.
श्रमदानानंतर आंघोळ करुन आराम झाल्यानंतर दुपारी मार्गदर्शन असते तज्ञ व्यक्तीचे. संध्याकाळी सोमनाथ परिसरात फिरणं, खेळ..इ आणि मग संध्याकाळी जेवण झालं की रात्री सांस्कृतिक कार्यक्रम. नृत्य, गाणं, नाटक, पथनाट्य..अशा वेगवेगळ्या गोष्टी सादर होतात. तसंच वृक्षदिंडीसारखा एक अभिनव कार्यक्रमही इथे सादर होतो. एका सजवलेल्या पालखीत वृक्ष ठेऊन पारंपरिक वाद्यांचा गजर करत ही दिंडी शिबीर परिसरात फिरते व शिबीरात आलेल्या लहान मुलांच्या हस्ते वृक्षारोपण होते.
या शिबीराने आम्हाला काय दिलं,असेल तर या शिबीरामुळं आम्हाला समाजातल्या मुख्य समस्यांची ओळख झाली. आपली समाजव्यवस्था अशी का आहे, प्रॉब्लेम्स काय आहेत..याविषयी विचार करायला सुरुवात होते. शारीरिक कष्टाची कामे करणारी आपल्या आजूबाजूला असंख्य लोक असतात. त्यांना समाजात हलक्या दर्जाचं समजलं जातं;पण इथं आम्हाला श्रमप्रतिष्ठा हे मूल्य समजल. या सा-या श्रमिकांमुळेच, कष्टक-यांमुळेच देश चालतो, ही बाब समजली.
त्यामुळे शिबीराहून परत आल्यानंतर मी शांत राहिलो नाही. स्वस्थ बसलो नाही. वेगवेगळ्या सामाजिक चळवळींमध्ये आणि उपक्रमांमध्ये मी सहभागी झालो. माझा अभ्यास सांभाळून मी शक्य तितके सक्रिय राहण्याचा प्रयत्न करतो नि दरवर्षी शिबीराला जातो.
-घनःश्याम येनगे


Wednesday, March 4, 2015

सकाळ २५ फेब्रुवारी २०१५ ...आणि पुन्हा सुरू झाला प्रवास. कष्टाकडून... कष्टाकडे!

उसाची गाडी ओढताना बैलाचे पाय घसरत आहेत, याची कल्पना आल्यानंतर गाडीवान खाली उतरला. त्याने बैलांचे कासरे कारभारणीच्या हातात दिले. पण जे व्हायचे ते झालेच.
 

धन्याने दुसऱ्या बैलाची वेसण सोडली आणि खाली पडलेल्या बैलाला उठविण्याचा प्रयत्न सुरू केला. या आणीबाणीच्या प्रसंगाने गाडीवर मागे बसलेल्या मुलांकडे दुर्लक्ष करण्यास कारभारणीला भाग पाडले.
 

एका हाताने यश येत नाही म्हटल्याने धन्याने दोन्ही हातांनी बैलाला उठविण्याचा प्रयत्न चालविला. तर गाडीवर उभारलेल्या मालकीणीनेही कासरा ओढून हातभार लावला.

बैलाची जिद्द आणि धनी व मालकीणीचे प्रयत्न याची परिणती म्हणजे बैल गुडघ्यावर उभा राहिला.

 बैल उठून उभारल्यानंतर धन्याने प्राधान्य दिले ते बैलाला ‘सापती‘ नव्याने बांधण्याला. तर गाडीवानाची जबाबदारी यशस्वीपणे पार पाडल्यानंतर मालकीणीनेही गाडीवर मागे बसलेल्या चिल्ल्यापिल्ल्यांना सावरले.
 
....आणि पुन्हा सुरू झाला प्रवास. कष्टाकडून... कष्टाकडे!

Tuesday, January 27, 2015

3 ways Steve Jobs made meetings productive



Here are three ways the iconic CEO made meetings super productive.

1. He kept meetings as small as possible.
In his book “Insanely Simple,” longtime Jobs collaborator Ken Segall detailed what it was like to work with him.
In one story, Jobs was about to start a weekly meeting with Apple’s ad agency.
Then Jobs spotted someone new.
“He stopped cold,” Segall writes. “His eyes locked on to the one thing in the room that didn’t look right. Pointing to Lorrie, he said, ‘Who are you?'”
Calmly, she explained that she was asked to the meeting because she was a part of related marketing projects.
Jobs heard her, and then politely told her to get out.
“I don’t think we need you in this meeting, Lorrie. Thanks,” he said.
He was similarly ruthless with himself. When Barack Obama asked him to join a small gathering of tech moguls, Jobs declined — the President invited too many people for his taste.

2. He made sure someone was responsible for each item on the agenda. 
In a 2011 feature investigating Apple’s culture, Fortune reporter Adam Lashinsky detailed a few of the formal processes that Jobs used, which led Apple to become the world’s most valuable company.
At the core of Job’s mentality was the “accountability mindset” — meaning that processes were put in place so that everybody knew who was responsible for what.
As Lachinsky described:
Internal Applespeak even has a name for it, the “DRI,” or directly responsible individual. Often the DRI’s name will appear on an agenda for a meeting, so everybody knows who is responsible. “Any effective meeting at Apple will have an action list,” says a former employee. “Next to each action item will be the DRI.” A common phrase heard around Apple when someone is trying to learn the right contact on a project: “Who’s the DRI on that?”
The process works. Gloria Lin moved from the iPod team at Apple to leading the product team at Flipboard — and she brought DRIs with her.
They’re hugely helpful in a startup situation.
“In a fast-growing company with tons of activity, important things get left on the table not because people are irresponsible but just because they’re really busy,” she wrote on Quora. “When you feel like something is your baby, then you really, really care about how it’s doing.”

3. He wouldn’t let people hide behind PowerPoint.
Walter Isaacson, author of the “Steve Jobs” biography, said, “Jobs hated formal presentations, but he loved freewheeling face-to-face meetings.”
Every Wednesday afternoon, he had an agenda-less meeting with his marketing and advertising team.
Slideshows were banned because Jobs wanted his team to debate passionately and think critically, all without leaning on technology.
“I hate the way people use slide presentations instead of thinking,” Jobs told Isaacson. “People would confront a problem by creating a presentation. I wanted them to engage, to hash things out at the table, rather than show a bunch of slides. People who know what they’re talking about don’t need PowerPoint.”


Source: link

Monday, December 22, 2014

मानवतेचा अभय साधक

सामान्यत्वातून साधक होण्यापर्यंतचा प्रवास सोपा नाही. यासाठी कुठल्याही साधकाच्या अंगी साधना असावी लागते अन् या साधनेसाठी आवश्यक असते कठोर उपासना. या दोन्हीचा आधार लाभला, की मग साधकाची वाटचाल सुरू होते नवसर्जनाच्या दिशेने. या संपूर्ण प्रवासात काय गमवायचे आहे आणि काही कमवायचे आहे, ही भावनाच गळून पडते अन् एका विशिष्ट निर्धाराने निघालेल्या या साधकाला एक अशी स्थिती प्राप्त होते, जेथे त्याला बघून इतरांचे हात जुळतात, हृदये एक होतात, लाखो स्वप्नधुंद ज्वालांचे हितगुज तेथे चालते अन् अतिथी म्हणून आलेला प्रत्येक आनंदी किरण तेथील रहिवासीच होऊन जातो. मानवतेचा अभय साधक म्हणून ओळखल्या जाणार्‍या बाबा आमटेंचे वर्णन याहून वेगळे ते काय करता येईल. 
सहा कुष्ठरोगी, १४ रुपये रोख, १ आजारी गाय व सरकारकडून मिळालेली ५0 एकर नापीक जमीन या एवढय़ा ‘मालमत्ते’च्या बळावर कुष्ठरुग्णाच्या अंगावरील दृश्य स्वरूपातील व समाजाला लागलेल्या अदृश्य स्वरूपातील आजारावर उपचार शोधण्यासाठी निघालेला हा अवलिया खरंच या शतकातला रिअल हीरो. आज बाबा आमटेंचे जन्मशताब्दी वर्ष साजरे होत असताना त्यांच्या कर्तृत्वाने उजळलेल्या साहसकथा या नव्या पिढीलाही कळल्या पाहिजेत.
बाबांना एक नवा, निरोगी व सशक्त समाज घडवायचा होता व त्यासाठी वाट्टेल ती किंमत मोजायची तयारी होती; परंतु बाबा या विचारापर्यंत कसे पोहोचले, हे जाणून घ्यायचे असेल, तर आधी त्यांच्या बालपणात डोकवावे लागेल. 
मुरलीधर देवीदास ऊर्फ बाबा आमटेंचा जन्म वर्धा जिल्ह्यातल्या हिंगणघाट येथील ब्राह्मण जमीनदार कुटुंबात डिसेंबर २६ डिसेंबर १९१४ रोजी झाला. वरोड्यापासून पाच-एक मैलांवरील गोरजे गावाची जमीनदारी आमटे घराण्याकडे होती. घरच्या सुबत्तेमुळे त्यांचे बालपण सुखात गेले. बाबांनी नागपूर विद्यापीठात कायद्याचे शिक्षण घेऊन १९३४मध्ये बी. ए. व १९३६मध्ये एल. एल. बी. ही पदवी संपादन केली. डॉक्टर होऊन समाजाची सेवा करावी, असे बाबांचे विचार होते; परंतु वडिलांच्या आग्रहाखातर ते वकील झाले. यानंतर त्यांनी काही काळ वकिलीही केली; पण असाध्य गोष्टींना स्वत:हून सामोरे जाण्याच्या आव्हानात्मक वृत्तीमुळे या विलासी आयुष्यात मन काही लागत नव्हते. अखेर मनाचा निर्णय पक्का झाला व एक दिवस मोहाचे हे सर्व पाश तोडून त्यांनी थेट गांधीजींच्या सेवाग्राम आश्रमाची वाट धरली. यापुढचे आयुष्य कोणत्या दिशेने जाईल, याचा काहीच थांग लागत नसताना एका पावसाळी संध्याकाळी अचानक त्यांना त्यांच्या जीवनाची दिशा गवसली.  बाबा कुठून तरी परतत असताना एका गटाराशेजारी कुष्ठरोगाने पीडित असलेलं एक जणू जिवंत प्रेतच बाबांना दिसलं आणि अनामिक भीतीने ते चक्क पळून जायला लागले; परंतु काही वेळ प्रचंड अस्वस्थतेत घालविल्यानंतर माघारी फिरले अन् त्या कुष्ठरोग्याला उचलून घरी आणून त्याची जमेल तशी सेवा केली. हीच घटना बाबांच्या आयुष्यासाठी टर्निंग पॉइंट ठरली. पुढे त्या कुष्ठरुग्णाचा मृत्यू झाला; पण या मृत्यूनेच जणू बाबांच्या आयुष्यात एक चैतन्याचं गुपित उलगडल.ं. जिथे भीती आहे, तिथे प्रीती नाही; जिथे प्रीती नाही, तिथे परमेश्‍वर असूच शकत नाही, या निष्कर्षाप्रत बाबा पोहोचले व त्यांनी यापुढचे संपूर्ण आयुष्य कुष्ठरोग्यांसाठी झोकून द्यायचे ठरवले. 
जीवनात कुठलीच आशा शिल्लक नसलेल्या कुष्ठरोग्यांसमवेत बाबांनी अर्मयाद श्रमांतून पडीक माळरानावर ‘आनंदवन’ फुलवले तत्कालीन समाजात कुष्ठरोग हे मागील जन्मीच्या पापांचे फळ समजले जाई. यामुळे कुष्ठरोग्यांस वाळीत टाकले जाई. हे चित्र तर बाबांच्या प्रयत्नांनी बदलायला लागले होते; परंतु अवघ्या समाजाला कवेत घेऊ पाहणारा वर्ण व वर्गातील दुजाभाव, श्रीमंत व गरिबांत विस्तारणारी दरी त्यांना अस्वस्थ करीत होती. या सामाजिक आजाराचाही बंदोबस्त करावाच लागेल, असा एक नवा निर्धार बाबांनी केला व राष्ट्रीय एकात्मतेचा प्रसार करण्यासाठी १९८५मध्ये ‘भारत जोडो’ अभियानाची मुहूर्तमेढ रोवली. या अभियानाच्या निमित्ताने त्यांनी भारतभ्रमण करून जनतेपर्यंत एकात्मतेचे तत्त्व पोहोचवले आहे.
नर्मदा बचाव आंदोलनात तब्बल १२ वर्षे नर्मदेकाठी मुक्काम करून बाबांनी या आंदोलनाला सामाजिक चळवळीचे रूप प्राप्त करून दिले. ‘देखणे ते हात ज्यांना निर्मितीचे डोहाळे’ या कवितेच्या ओळींना वास्तवात उतरवत केवळ कुष्ठरोग्यांसाठीच नव्हे, तर अंधांसाठी, मूकबधिरांसाठी विशेष शाळा उभारल्या. कुष्ठरोग्यांच्या शैक्षणिक उत्कर्षासाठी महाविद्यालयाचीही स्थापना केली. प्रौढ व अपंगांसाठी हातमाग, सुतारकाम, लोहारकाम असे व्यवसाय प्रशिक्षण सुरू करून त्यांना आर्थिक स्वावलंबनाचा मार्ग दाखवला. शेती व त्या अनुषंगाने येणारे दुग्धशाला, गोशाळा, कुक्कुटपालन, शेळी-मेंढीपालन आदी कुटीरोद्योगही सुरू करून दिले. अशोकवन (नागपूर), सोमनाथ (मूल) या ठिकाणीही उपचार व पुनर्वसन केंद्रे स्थापन केली.  बाबा प्रत्यक्ष समाजकार्यात नसते, तर मोठे साहित्यिक म्हणून समाजासमोर आले असते, इतके त्यांचे साहित्य दज्रेदार आहे. सामाजिक कार्यात स्वत:ला झोकून दिले असतानाही त्यांनी ‘ज्वाला आणि फुले’ आणि ‘उज्‍जवल उद्यासाठी’ हे काव्यसंग्रह लिहिले. यांतून त्यांच्या साहित्यिक गुणांसह समाजकार्यावरची निष्ठाही दिसून येते. मनस्वी संवेदनशीलता, प्रखर बुद्धिमता, धाडस, प्रचंड कष्ट करण्याची शारीरिक व मानसिक तयारी, कामाचा झपाटा, ठरवले ते साध्य करण्याची निश्‍चयी वृत्ती या बळावर बाबांनी देशाच्या सामाजिक इतिहासात आपला एक वेगळा ठसा उमटवला.  
९ फेब्रुवारी  २00८ रोजी वरोडा येथील निवासस्थानी रक्ताच्या कर्करोगाने बाबांचा हा दिव्य प्रवास लौकिकार्थाने थांबला असला, तरी कृतीतून मात्र तो अजूनही सुरूच आहे. आज बाबांच्या पुढच्या पिढीतील (डॉ. प्रकाश आमटे, विकास आमटे व त्यांचे कुटुंबीय) विविध प्रकल्पांच्या माध्यमातून बाबांनी शिकवलेल्या निष्ठेनेच समाजकार्याचा हा वसा सांभाळत आहेत. बाबा आपल्या कवितेतून म्हणायचे..
‘मला ठाऊक आहे,
हे सामान्य माणसाचे शतक आहे.
न्यायोचित माणसाला, अन्याय्य व्यवस्थेत
जागा एकच : तुरुंग किंवा मृत्यू
तुरुंगाबद्दल मला प्रेम आहे
आणि मृत्यूचे मला भय नाही.’
जीवनाचे सार्थक करणारे असे साधे व सोपे तत्त्वज्ञान सांगणार्‍या बाबा आमटे नावाच्या मानवतेच्या अभय साधकाने दाखवलेल्या या विधायक मार्गावर आपला समाज दोन पावले जरी पुढे चालला, तर हीच त्यांच्या जन्मशताब्दी वर्षाच्या समारोपानिमित्त बाबांना वाहिलेली खरी श्रद्धांजली ठरेल.
 

Saturday, November 22, 2014

माझा अविस्मरणीय दिवस........ २२ नोव्हेंबर २०१४

                     आजचा दिवस माझ्यासाठी अविस्मरणीय झाला. मोठ्या लोकांनी खूप म्हटलंय माणसात देव शोधारे बाबा..... आणि आज मला भेटले. देवत्व हे कर्तुत्वावर असते. पण काही स्वयंघोषित पण आहेत तिथे मला देव कधी दिसला नाही. प्रकाश आमटे हे माझे पुस्तक रुपी शिक्षक आहेत. ते जसे निसर्गाला देव मानतात त्याप्रमाणे मलाही निसर्गच आणि माणसाचे कर्तुत्व हेच देवासारखे वाटतात.
                    काल मला अशीच बातमी मिळाली कि painting exhibition आहे Raja ravivaerma art gallery मध्ये आणि त्याच्या उद्घाटनासाठी प्रकाश आमटे येणार आहेत. मग माझ्या आनंदाला पारावर उरला नाही. मी लगेच सगळे प्लान cancel केले आणि आज सकाळी मी माझ्या एका मित्राला घेऊन art gallery गाठली. मला वाटले गर्दीमुळे आणि आम्हाला उशीर झाल्यामुळे त्यांना भेटता येणार नाही असे वाटले. आणि चित्राचं प्रदर्शन पाहत असताना अचानक पाठीमागे पहिले तर सर डॉ प्रकाश आमटे आणि मंदाताई आमटे. त्यांना पहिल्या पहिल्या आजपर्यंत जितका आनंद झाला नव्हता तितका झाला. ज्यांच्याबद्दल आतापर्यंत फक्त पुस्तकातच वाचले होते ते अचानक समोर आल्यावर काय बोलावे काही समजेना. ज्यावेळी मी खचतो त्यावेळी मी त्यांची मला आवडलेली वाक्य वाचतो. त्यावेळी असे वाटते कि किती तरी संकट पार त्यांनी केली आहेत. आपल्यासमोर जे आहेत ती  त्या तुलनेत तर काहीच नाहीत. त्यांच्याशी एक दोनच वाक्य बोललो आणि त्यातून मला त्यांचा साधेपणा खूप आवडला. ते असे बोलत होते कि माझी आणि त्यांची पहिल्यापासून ओळख आहे. त्यांना कितीतरी लोक भेटत असतील तरी ते  तितक्याच उत्साहाने सर्वांशी तितक्याच प्रेमाने बोलतात. प्रेमावरून आठवले . तुम्हाला माहितच असेल त्यांचा आणि प्राण्यांचा जिव्हाळा. जर माणूस प्रेमळ असेल तर हिंस्र प्राणीही तुमच्याशी तितकेच प्रेम करतो. प्रेमावरती खूप चित्रपट पहिले. खूप पुस्तके वाचली पण असे उदाहरण नाही. मंदाताई आमटे यांच्या विषयी बोलायचं म्हटले तर खूप मोठी पोस्ट तयार होईल. त्यासाठी तुम्ही पुस्तकच वाचा असे म्हणेन.मी वाचनाची सुरवात केली ती  विलास मनोहर यांच्या "मला न कळलेले बाबा " ह्यापासून आणि आणि आता सर्वच पुस्तके वाचावी असा निर्धार केला आणि प्रकाश आमटे,विलास मनोहर, साधनाताई आमटे यांची  मी न वाचलेली सर्व पुस्तके विकत घेतली. आता दोन महिने पुरतील तितकी आहेत. आता फक्त बाबा आमटे यांनी लिहिलेली पुस्तके विकत घायची राहिली आहेत.

                       बाबा आमटेंच एक वाक्य मला खूप आवडते "तुम्ही जगाकडे पाठ फिरवा ,जग तुमच्या पाठीशी राहील" आणि त्याचा परिणाम आज आपण पाहतच आहोत.

Sunday, October 5, 2014

व्याख्या मैत्री ची

मैत्री एक सोपी व्याख्या 
'रोज आठवण यावी
अस काही नाही,
रोज भेट व्हावी
अस काही नाही,
एवढंच कशाला रोज
बोलणं व्हावं अस ही
काहीच नाही. पण मी
तुला विसरणार नाही
ही झाली खात्री, आणि
तुला याची जाणिव
असणं ही झाली मैत्री.'

अशी सोपी सरळ पण
घट्ट मैत्री टिकवणं निर्माण
करणं फार कठीण नाही
आणि फार सोपही नाही.
मनाचा एवढा हळवेपणा
नवरा - बायकोच्या
नात्यामध्ये नाही हो येत.
तिथे मित्रच असावा
लागतो. कारण इतर
कुठल्यही नात्याला
आपण नाव देतो आणि
नाव दिलं की त्या बरोबर
मानसिक, शारिरीक,
कौटुंबीक आणि
सामाजीक बंधन पण
येतात. ह्या नात्याला मात्र
नाव नाही आणि त्यामुळे
कसली बंधनही नाहीत.
आणि किंबहूना ती तशी
नसावीतही. वाट्टेल त्या
विषयावर आपण गप्पा
मारू शकतो मोकळे
होउ शकतो. तिथे
स्त्री - पुरूष, जात - पात
काही नाही आडवे येत.
मनसूबा बनून जातो आणि
मन आनंदी होतं.
शेवटी काय हो भेटी
नाही झाल्या तरी गाठी
बसणं महत्वाचं. ज्यांनी
हे जाणलं त्यांनी माणसातलं माणूसपण जाणलं अस
मी समजतो. अशा सगळ्या
मित्रांना माझ्या शुभेच्छा.
ही नाती टिकवा आणि
आयुष्याचा आनंद घ्या.
आनंद आनंद म्हणजे काय
हो, अहो अशी नाती
जोडणं असे मनसुबे
जुळवणं हाच आनंद.
लक्षात ठेवा तोडणं सोप
आहे पण जुळवणं आणि टिकवणं कठीण.
- पु. ल. देशपांडे.

Friday, September 12, 2014

पु.लं.देशपांडे

माझ्याबद्दल अशी एक हकिगत सांगितली जाते
की, माझे लहानपण अत्यंत गरिबीत गेले.
खरे म्हणजे
गरिबीत वगैरे काही गेले नाही, पण आजच्याइतके ते
चांगल्या स्थितीत गेले नाही एवढे मात्र
निश्चित !

पण तेव्हाही आम्हांला आम्ही गरीब
आहोत ह्याची आठवण व्हायला फुरसत नसायची.
आज काय बालगंधर्वाचे गाणे आहे, पळा तिकडे !
उद्या काय सी.के.नायडूंची मॅच आहे, जा तिकडे. मग
कधी ती झाडांवर चढून बघ, तर
कधी दुसऱ्याच्या गच्चीवरुन ! (फुकट बघायला मिळते
म्हणून.) आमच्या पाठीमागे इतकी व्यवधाने असत
की आमच्या गरिबीचीसुद्धा आम्हांला आठवण
होत नसे.
ह्याबाबत टागोरांची एक कविता सांगतो.---एक
माणूस असतो. त्याच्या गळ्यात एक
लोखंडाची साखळी असते.
ती सोन्याची करण्यासाठी त्याला परीस
शोधायचा असतो. समुद्राच्या काठाने
जाताना तो सारखा दगड घ्यायचा,
साखळीला लावायचा आणि खाली टाकून
द्यायचा ! असे करता करता निराश होऊन खूप पुढे
गेल्यावर त्याने सहज साखळीला हात लावून
पाहिला तर ती केव्हाच
सोन्याची झालेली होती ! त्याच्या हातातून
परीस केव्हाच निसटून गेला होता.
तुमच्याही प्रत्येकाच्या हातात परीस आहे.
कोणाच्या हातात तो चित्रकलेच्या रुपात
आहे,कोणाच्या हातात संगीताच्या रुपाने ! फक्त
त्याकडे नीट बघावयास शिका. याबद्दल मला एक
उर्दू शेर आठवतो---"बगीच्यात फुलांचे ताटवे फुलले
आहेत, गुलाबाची फुले डुलत आहेत, पण त्यांकडे
बघण्यासच कोणी नाही."
------------------- पु.लं.देशपांडे

Thursday, July 3, 2014

This called as truth of life.....

एके दिवशी एका शेतक-याचं गाढव
शेतातल्या कोरड्या विहिरीत पडलं.
जखमी झाल्यामुळे ते विव्हळत होतं
आणि मोठ्याने ओरडत होतं.
लोकं जमा झाले शेतकरी धावत आला त्याने
बराच विचार केला फार प्रयत्न केले.
त्या गाढवाला त्या विहीरीतून बाहेर काढण्याचे
पण काही करता त्याला बाहेर काढणे जमत नव्हते.
दिवस मावळायला आला होता
शेतकरीही आता थकला ही होता आणि कंटाळला होता त्याने
विचार केला .
'आता हे गाढव तर असेही म्हातारे
झाले आहे असेही निरुपयोगी आहे
आणि ती विहिरही कोरडीचं आहे ...
त्याला बाहेर काढण्या पेक्षा त्याला बुजून द्यावे..
विहीरीत माती लोटावी...
गाढवाचा प्रश्न ही सुटेल
आणि शेतातली ही विहीरही बुजली जाईल.......'
मग काय जमलेल्या सार्या लोकांकडून त्याने
मदत मागीतली. आणि सगळे कामाला लागले
कुदळ फावड्यांनी माती टाकायला सुरुवात झाली.....
मध्ये पडलेल्या त्या जखमी गाढवाला काही कळेनासे झाले ...
विहीरीत पडल्याने शरीराला झालेल्या जखमांची वेदना आणि त्यात
भर म्हणजे आयुष्यभर ज्या मालकाची चाकरी केली
त्याची ओझी वाहीली आज तोचं मालक जिवावर उठला ...
ते दुखाने अजून मोठयाने ओरडू लागले....
वरुन माती पडतचं होती...
काही वेळाने गाढवाचा ओरडण्याचा आवाज थांबला .....
सागळ्यांना वाटले गाढव मेलेचं बहुतेक
शेतक-याने सहज विहीरीत डोकावून पाहीले
तर
तो पहातचं राहीला...
अंगावरची माती झटकत गाढव उभे राहीले होते...
लोकांनी अजून पटापटा माती टाकणे सुरु केले...
परत पाहीले तर गाढव त्याचा त्याचा मग्न होता तो वरुन
माती पडली की झटकायचा आणि त्या पडलेल्या
मातीच्या थरावर उभा राहीचा ......
असं करता करता कोरडी विहीर बरीचं
भरली आणि कठडा जवळ येताचं ते गाढव
तो कठडा ओलांडून बाहेर आले......
आयुष्यात वेगळे तरी काय होतं ???
आपण खड्यात पडलो तर आपणास
काढायला कोणीतरी एकचं येते पण
आपल्यासाठी खड्डे खणणारे आणि खड्यात
पडल्यावर माती लोटणारे
आपल्याला गाडण्याचा प्रयत्न करणारे बरेचं भेटतात...
म्हणून स्वतःवर नेहमी विश्वास ठेवा ....
आपले डोके नेहमी शांत ठेवा
समस्या कीतीही मोठी असो....
शांत मनाने ती हाताळा....
खड्ड्यात पडलो आणि कोणी पाडलं ह्या बद्द्ल
दुखः करायपेक्षा त्यातून बाहेर कसे पडायचे हा विचार करा.....
झटका ती माती आणि त्या मातीची एक एक पायरी करत...
हळूहळू करत वरया............

Wednesday, June 4, 2014

मोठ आहे....पण खुप छान आहे...नक्की वाचा.....

मोठ आहे....पण खुप छान आहे...नक्की वाचा.....

ती गाडी चालवत होती सोबत वडील
होते .....
रस्त्याने जात होते ...अचानक
वारा सुटला ......
आभाळ भरुन आले ... विजा कडाडू
लागल्या ...वार्‍याचा वेग वाढला ... घोंघावते वादळ सुरु झाले ...
ती घाबरली वडीलांना विचारले " गाडी थांबवू
का ? काय करु ? "
" चालवत रहा " वडील म्हणाले .....वार्‍या मुळे
गाडी हदरत होती ....
वादळाचा वेग वाढत होता ... " बाबा काय करायचे थांबायचे का ? "
तीने परत घाबरुन विचारले ..
" चालवत रहा , जाउ दे गाडी पुढे , थांबू नको "
वडील म्हणाले ........
पुढचे नीट काहीचं दिसत नव्हते ... फक्त
काही ती अंधून दिसात होते ... तितक्यात त्यांच्या पासून काही अंतरावर
तीला एक मोठी ट्रक
झाडाला धडकता दिसली ... ती अजून
घाबरली ......
" बाबा इतकी मोठी गाडी वादळात
पहा कधी झाली " " त्या कडे लक्ष नको देवू चालत रहा " वडील
म्हणाले
वादळाने फार वेग
घेतला होता ...ती गाडी चालवतचं होती ....
काही अंतर पुढेगेली आणि तीला जाणवले
वादळ जरा ओसरते आहे ... काही किलोमीटर पुढे गेल्यावर वादळ शमले
होते ......
पुढे जमीन अगदी कोरडी आणि आभाळ
अगदी स्वच्छ होते ......
" थांब आता आणि बाहेर निघ " तिचे वडील
म्हणाले ........ " पण आता का ?" तीने आश्चर्याने विचारले
" बाहेर निघ आणि जरा मागे पहा अजून बरेचं
लोकं त्या वादळात आहेत
तु त्या वादळातून बाहेर आली म्हणजे
सुटली असे नाही .. जा आता त्यांना मदत कर
तुला माहीत आहे आता त्या वादळातून कसे बाहेर पडायचे ते ...... वादळ आहे तीथेचं आहे" जीवनाच्या प्रवासात अशी वादळं
नेहमी येतात आणि जेव्हा आपण त्यात
सापडतो
तेव्हा जे नेहमी आपल्या सोबत असतात
आपल्याला धीर देतात ,
आपल्या पाठीवर हात ठेवून आपल्याला मार्ग दाखवतात ...........
ते आपले वडील , आई , आपले भाऊ बहिण ,
मित्र
नेहमी आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे
असतात...
आपणास जगायचे कसे , संकाटाशी दोन हात कसे करायचे ते शिकवतात ...
मदत करायला शिकवतात....जगाय चे कसे ते
शिकवतात ....