Amazon

Showing posts with label Nature. Show all posts
Showing posts with label Nature. Show all posts

Saturday, December 24, 2016

वसंतऋतू आणि मी

हाच तो इयत्ता दुसरी मधला बालभारतीचा शेवटचा धडा,

जिथून मला वसंत ऋतूची ओळख झाली, त्यावेळी समजलं नव्हता कि यामध्ये वसंत ऋतूच वर्णन आहे, माहित नाही का? पण या मधल्या ओळी मी कधीच विसरू शकलो नव्हतो  त्या म्हणजे नवीन फुटलेली पालवी,  खडकावर उमलणारा पांढरा चाफा, अगदी दुसरी इयत्ता संपली तरी मी खडका वर उमलणारा पांढरा चाफा शोधत राहायचो, सापडला कुठेतरी, नक्की कुठे ? ते आठवत नाही. पण पांढरा चाफा शोधता शोधता लाल पळस खूप सापडले, तसे आमच्या शेताकडे खूप होते, खरंच ह्या धड्यात सांगितल्याप्रमाणे ऐन वसंतात कडक उनात लाल भडक पळस उमलेला दिसायचा, झाड जवळ गेलो कि असंख्य मधमाश्या दिसायच्या मग एक फाटा तोडायचो, अगदी विकत आणलेल्या गुच्छा सारखा दिसायचा.  कोणाला द्यावा बर गुच्छ हा ? कोणी नव्हते म्ह्णून मी तो सायकलच्या हॅन्डल अडकवून शेतातून घरी यायचो .. मस्त स्वच्छंदी शेतात फिरून.

ह्या धड्यातल्या अजून खूप गोष्टी मी विसरलो नव्हतो, रस्त्यावर येऊन थंडगार धुळीत सापांना बरे वाटते असं वर्णन होत .. तेंव्हा सकाळी शेतात जाताना मी सापाच्या खुणा शोधायचो, शोधायचो म्हणजे खूप कष्ट वगैरे घेत नव्हतो फक्त जाताना मातीचे ठसे पाहायचो. जस जस वय वाढत गेलं तश्या तश्या गोष्टींचा उलगडा होत गेला आणि मग वसंत ऋतू म्हणजे माझ्यासाठी स्वच्छंदी फिरण्यासाठी दरवर्षीची पर्वणीच झाली!

तस मी अनेक कविता शोधायचो इंटरनेट वर पण हा धडा सापडला आणि माझ्या आनंदाला पारावर उरला नाही !  पहा तुमच्या पण काही आठवणी आहेत का यांसारख्या ?


Tuesday, December 29, 2015

२७. चाहूल ( इयत्ता दुसरी, १९९० )


Wednesday, June 24, 2015

मेणवली घाट , वाई -सातारा

 मेणवली घाट , वाई -सातारा

आपण हा घाट अनेक हिंदी चित्रपटांमधे पाहिला असेलच ,
उत्तरप्रदेश,बिहार मधील गावांची नावे वापरली जातात
पण शुटींग मात्र इथेच (आपल्या साताऱ्यात) होत असते
वाईपासून तीन किलोमीटर अंतरावर मेणवली गाव आहे.
या गावाला पर्यटनस्थळ म्हणून प्रसिद्धी मिळाली
ती नाना फडणवीसांनी कृष्णा नदीच्या काठावर बांधलेल्या
भव्य वाड्यामुळे आणि काठावरील मंदिरांमुळे.
फडणवीसांनी मेणवलीत वाडा, अमृतेश्वर मंदिर, विष्णू-लक्ष्मी
(मेणवलेश्वर) मंदिर आणि कृष्णानदीवर घाट बांधला.
नानांचा वाडा गढीवजा असून मराठी वास्तुशैलीचा हा एक उत्कृष्ट नमुना आहे.
वाड्याला बाजूने उंच तटबंदी केलेली आहे. नक्षीकाम केलेली पाण्याची कुंडेही पाहावयास मिळतात.
या ठिकाणाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे वाड्यात असणाऱ्या
जवळजवळ सर्वच खोल्यांमध्ये वेगवेगळ्या पौराणिक कथांवर आधारित चित्रे रेखाटली आहेत.
इसवीसन १७७० ते १८०० या दरम्यान काढलेली ही चित्रे आवर्जून पाहण्यासारखी आहेत.
या सर्वांपेक्षा वेगळे चित्र लक्ष वेधून घेते ते म्हणजे मस्तानीला समोर बसवून काढलेले तिचे चित्र.
सातारा ते मेणवली अंतर ३६ किलोमीटर आहे.
वाईपासून पुढे मेणवलीला जाता येते.
या गावाच्या घाटावरील प्रचंड घंटा हेही एक आकर्षणकेंद्र असून,
वाईप्रमाणेच याही गावाला चित्रीकरणासाठी पसंती दिली जाते.
अभिमान वाटला पाहिजे इतकी सुंदर निसर्ग
आणि तितक्याच तोडीची पर्यटन स्थळे आपल्या महाराष्ट्रात आहेत